मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणीने पीक निहाय कृषि सल्ला दिला आहे. यात भुईमुग, गहू, ज्वारी या पिकांसाठी पीक व्यवस्थापन कसे करावे या विषयीची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ तर चौथ्या व पाचव्या दिवशी अंशत: ढगाळ राहून पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ०२ व ०३ फेब्रुवारी रोजी मराठवाड्याच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची तर मराठवाड्याच्या पूर्व भागात पुढील चार दिवसात किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची तर पाचव्या दिवशी २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसात छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ तर चौथ्या व पाचव्या दिवशी अंशत: ढगाळ राहून पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ०२ व ०३ फेब्रुवारी रोजी मराठवाड्याच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची तर मराठवाड्याच्या पूर्व भागात पुढील चार दिवसात किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची तर पाचव्या दिवशी २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसात छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ३१ जानेवारी ते ०६ फेब्रुवारीदरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तर इतर जिल्ह्यात सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश :प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तूर :तूर पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
ज्वारी : रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
गहू : गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस) पाणी द्यावे.
भुईमूग : उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी ८ फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.११, टीएजी २४, एलजीएन-१, टीएलजी-४५, टीजी २६, जेएल २४, जेएल २२० या वाणांपैकी वाणाची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबीयम व पीएसबी प्रति १० किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.
मका : मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी : केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल १०% ईसी १० मिली किंवा मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५% डब्ल्यू जी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
द्राक्ष : द्राक्ष बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी./p>
भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी (टोमॅटो, वांगे, मिरची) भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे तर वेलवर्गीय व भेंडी पिकाची लागवड करावी.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी गॅलर्डिया फुल पिकाची लागवड करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे तसेच दर पंधरा दिवसाला गोठा व गोठ्याचा परिसरात किटकनाशकाची फवारणी करावी व गोठ्यातील खड्डा व भेगा असतील तर त्या बुजवून घ्याव्यात व गोठा व गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)