Join us

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान मदतीचा शासन निर्णय जारी कोणत्या जिल्ह्याला किती मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 9:02 AM

राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती, मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

केंद्र शासनाने विहित केलेल्या नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले असून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली आली आहे.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, जून ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत संबधित विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते त्यानुसार शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय निधी वितरणगडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लक्षवर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लक्षचंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लक्षनागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लक्षपुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लक्षसातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लक्षसांगली जिल्ह्यासाठी १११३.२५ लक्षअमरावती  जिल्ह्यासाठी ५१.०१ लक्षअकोला जिल्ह्यासाठी १२९०.१७ लक्षयवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लक्षबुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लक्षवाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लक्षअशा एकूण २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :पाऊसपीकशेतीशेतकरीसरकारराज्य सरकार