Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : 12 हजार शेतकरी ई-केवायसीविना, 162 कोटी रुपये तिजोरीत पडून....

Agriculture News : 12 हजार शेतकरी ई-केवायसीविना, 162 कोटी रुपये तिजोरीत पडून....

Latest News Agriculture News 12 farmers in Jalgaon district do not have E KYC see details | Agriculture News : 12 हजार शेतकरी ई-केवायसीविना, 162 कोटी रुपये तिजोरीत पडून....

Agriculture News : 12 हजार शेतकरी ई-केवायसीविना, 162 कोटी रुपये तिजोरीत पडून....

जळगाव : अवकाळी पाऊस, गारपिटीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यशासनाने भरपाईची ४०४ कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. ...

जळगाव : अवकाळी पाऊस, गारपिटीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यशासनाने भरपाईची ४०४ कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. ...

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : अवकाळी पाऊस, गारपिटीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यशासनाने भरपाईची ४०४ कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यातील २८० कोटींच्या भरपाईची रक्कम २ लाख १३ हजार ४१६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र, १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने १६२ कोटींवर भरपाईची रक्कम प्रशासनाच्या तिजोरीतच पडून आहे.

जिल्ह्यातील १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे प्रमाणिकरण केलेले नाही. त्यामुळे शासनस्तरावरून मंजुरी मिळाली असतानाही अनुदानाची रक्कम या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करता आलेली नाही. प्रशासनाने गावस्तरावरील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले. तरीही १२ हजारांवर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याचे उघड झाले आहे.

या तालुक्यांत सर्वाधिक

जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा, अमळनेर व जामनेर या तालुक्यांत अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी ५ हजार ८५४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासनस्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करता आले नाही.

३ लाखांवर शेतकरी बाधित

गत सहा महिन्यांत जिल्ह्यातील ३ लाखांवर शेतकरी बाधित झाले आहेत. पंचनाम्यानुसार त्यांना शासनाने मदत उपलब्ध केली आहे. ३ लाख ३१ हजार ६३४ बाधितांमध्ये सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात आहेत. या तालुक्यांत १ लाख ३ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यात केवळ २५४९ शेतकरी बाधित झाले आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान उपलब्ध केले आहे. वारंवार आवाहन करूनही संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या शेतकऱ्यांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करून अनुदानाचा लाभ घ्यावा.

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

तालुकानिहाय केवायसी न करणारे बाधित

तालुका-           बाधित-             अनुदान

अमळनेर-      ७११                ८४००८३०

भडगाव-       १४१५                १९२८१०२०

भुसावळ-     ३५४                  २४४०३९४

बोदवड-      ८५१                   २९५१३०७

चाळीसगाव-३८८७              ५१८९६८१९

चोपडा-         ९०                    ५५१६९५

धरणगाव-    ४४                     २१५८२०

एरंडोल-     ७९                      ५१९६९३

जळगाव-   १८६                    १५१९८१०

जामनेर-    ९०५                   ११२३७०७६

मुक्ताईनगर-२०७७             ४५७८६४८५

पाचोरा-   ७१२                     ४१८९५३९

पारोळा- ६६४                      ९२०६१९९

रावेर-    ३७१                       २५५०९११

यावल-  १६२                        १३८३३४५

एकूण१२५०८                     १६२१३०९४४

Web Title: Latest News Agriculture News 12 farmers in Jalgaon district do not have E KYC see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.