Join us

फळपिक विमा योजनेसाठी कोणत्या जिल्हांना कोणती विमा कंपनी? जाणून घ्या | Crop Insurance

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 7:52 PM

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मृग बहार आणि आंबिया बहारातील १३ फळ पिकांसाठी ही योजना लागू केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, ही फळपीक योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित केलेल्या फळपिकांसाठी लागू आहे. या हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष (क) इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे.

मृग बहरात द्राक्ष (क), संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची २५ जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे; त्याचबरोबर मोसंबी चिकू ३० जून, डाळिंब १४ जुलै तर सीताफळ पिकासाठी ३१ जुलै ही मुदत देण्यात आली आहे. या योजनेत विविध जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ४ विमा कंपन्या नेमल्या आहेत. 

कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या विमा कंपन्या?भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई - जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा,रत्नागिरीफ्यूचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. - जालनायुनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. - छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबारबजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे - ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक विमा