Join us

पीएम किसानचे खात्यात पैसे आले नाहीत; इथे करा तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 10:05 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर रोजी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केला. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेलच. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते त्याबाबत तक्रार करू शकतात.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर रोजी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केला. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेलच. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते त्याबाबत तक्रार करू शकतात.

कशी व कुठे करणार तक्रार?- pmkisan.gov.in या वेब- साइटवर जा.- होम पेजवर 'बेनिफिशरी स्टेटस'वर क्लिक करा.- नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाका, खालील कॅप्चा कोड नोंदवा.- 'गेट डाटा'वर क्लिक करताच हप्त्याची स्थिती व पैसे न आल्याचे कारण कळेल.

इथे ई-मेल करायोजनेच्या pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही तक्रार करता येईल.हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ / १८००११५५२६ (टोल फ्री) अथवा ०११ - २३३८१०९२ वर कॉल करा.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीपंतप्रधानसरकारी योजना