Lokmat Agro >शेतशिवार > यंदा ऊसाची ४० हजार मेट्रिक टन गाळप घटणार

यंदा ऊसाची ४० हजार मेट्रिक टन गाळप घटणार

This year, 40 thousand metric tons of sugarcane will be reduced | यंदा ऊसाची ४० हजार मेट्रिक टन गाळप घटणार

यंदा ऊसाची ४० हजार मेट्रिक टन गाळप घटणार

उसाची वाढ न झाल्याने यंदाही साखर हंगाम जेमतेम चालेल, तर मागील काही वर्षांत कमी दर दिलेले कारखाने उसाअभावी बंद ठेवावे लागणार आहेत.

उसाची वाढ न झाल्याने यंदाही साखर हंगाम जेमतेम चालेल, तर मागील काही वर्षांत कमी दर दिलेले कारखाने उसाअभावी बंद ठेवावे लागणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मागील वर्षी उसातील पाणी हटले नसल्याने, तर यंदा पाणी नसल्याने वजनात मोठी तूट येणार असल्याने 'ऊस' शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणार आहे. उसाची वाढ न झाल्याने यंदाही साखर हंगाम जेमतेम चालेल, तर मागील काही वर्षांत कमी दर दिलेले कारखाने उसाअभावी बंद ठेवावे लागणार आहेत.

निसर्ग मागे लागला तर हात धुवून मागे लागतो, असा प्रकार शेतकऱ्यांचा झाला आहे. मागील तीन वर्षे सरासरी व त्यापेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे चांगले आलेले खरीप पाण्यात गेले, तर रब्बीचे उत्पादनही म्हणावे तितके आले नाही. मागील वर्षी तर सरासरीच्या १११ टक्के इतका पाऊस पडला. कधी अतिवृष्टी तर कधी संततधार पाऊस पडल्याने चांगले आलेल्या खरीप पिकांतील पाणी हटले नसल्याने पिकांची काढणी करता आली नाही. शिवाय उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने रब्बी पेरणीसाठी वाफसा झाला नसल्याने उशिराने पेरावे लागले. त्याला अपेक्षित उतारा पडला नाही.

अशीच स्थिती उसाची झाली होती. चार-पाच महिने उसात पाणी राहिल्याने उसाला दशी पडली. त्यामुळे ऊस वजनात भरला नाही. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असूनही जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांचे अवघे १८२ लाख मेट्रिक टन गाळप झाले. यावर्षी पाऊस नसल्याने गरजे इतके पाणी उसाला मिळाले नाही. काही ठिकाणी पाणी असूनही पोषक वातावरण नसल्याने उसाची म्हणावी तितकी वाढ झाली नाही. त्याचा ऊस गाळपाला मोठा फटका बसणार आहे.

यावर्षी शासन १ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने दिवाळीनंतर साखर कारखान्यांचे गाळप वेग घेईल. यंदा उशिराने सुरू झालेला साखर हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय मागील दोन तीन हंगामांत दर कमी देऊन शेतकऱ्यांना हैराण करणाऱ्या कारखान्यांना शेतकरी ऊस देण्यास धजावण्याची शक्यता कमीच असल्याने असे कारखाने बंद राहतील असे सांगण्यात येते.

वर्ष गाळप (मे. टन)
२०१९-२०      ६३ लाख
२०२०-२१      १३६ लाख
२०२१-२२      २३० लाख
२०२२-२३      १८२ लाख
२०२३-२४      १४० लाख
(२०२३-२४ या नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्षातील गाळप हे अपेक्षित धरले आहे)

पाऊस नसल्याने यंदाच्या ऊस गाळपावर कमालीचा परिणाम होईल. जिल्ह्यातील ३८ साखर कारखाने सुरु करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, उसाअभावी एवढे कारखाने सुरू होतील, असे वाटत नाही. १३० ते १४० लाख मेट्रिक टन गाळप होईल असा अंदाज आहे. - पांडुरंग साठे, साखर सहसंचालक, सोलापूर.

Web Title: This year, 40 thousand metric tons of sugarcane will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.