Join us

निर्यातबंदीचा परिणाम; तुरीला मिळतोय किती भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 12:45 PM

सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता मागील महिन्यात बार्शी बाजार समितीत तूर विचेटलला ११ हजार ५०० रुपये व वैराग व सोलापूर बाजार समितीत ११ हजार, तर अक्कलकोट व दुधनी बाजार समितीत १० हजाराच्या पुढे दर गेला होता.

निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर जमिनीवर आले, १० महिन्यांपासून दूध खरेदी दर घसरल्याने जनावरे सोडून देण्याची वेळ आली, तेल आयातीमुळे सोयाबीन बाजार चार हजारांवर आला, इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने ऊस उत्पादकांचे अवसान गळाले, इतर शेती उत्पादनाचे बाजारात हाल सुरू असताना ११ हजारांचा टप्पा पार केलेल्या तुरीचा तोरा आठ हजारांपर्यंत खाली आला. शेतीमालाची ही कधी नव्हे त्या अवस्थेने राज्यातील शेतकऱ्यांचे पुरते हाल सुरू आहेत.

शेतात कोणतेही पीक घ्या अथवा जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय करण्याचे धाडस केले तर नक्कीच अडचणीत येऊ शकता? अशी सध्याची स्थिती आहे. कारण, शेतात कोणत्याही पिकांच्या उत्पादनासाठी केलेला खर्चही धान विक्रीतून निघत नाही हे चित्र मागील ३-४ वर्षांत तर अधिक गडद झाले आहे. दोन तीन वर्षे कोरोनामुळे संपूर्ण शेती आतबट्ट्याची ठरली होती.

दहा हजारांच्या पुढे होता दर..सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता मागील महिन्यात बार्शी बाजार समितीत तूर विचेटलला ११ हजार ५०० रुपये व वैराग व सोलापूर बाजार समितीत ११ हजार, तर अक्कलकोट व दुधनी बाजार समितीत १० हजाराच्या पुढे दर गेला होता. आता तोच दर तीन हजारांहून अधिक कमी झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे तुरीचे भावअक्कलकोट - ८१००-९१००सोलापूर - ८१००-९२००बार्शी - ८०००-९०००वैराग - ७८००-८५००दुधनी - ८५००-९१००

शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला बाजारात येण्यास सुरुवात झाला की खरेदी दर कमी होण्यास सुरुवात होते. गेली वर्षभर ऊस, सोयाबीन, कांदा व दूध उत्पादक शेतकरी दराच्या घसरणीमुळे अडचणीत आले आहेत. आता तुरीच्या दरात तीन ते साडेतीन हजार रुपयाने घसरण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. - सुहास पाटील, रयत क्रांती संघटना

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरशेतकरीपीकशेती