Join us

काजूची आवक झाली कमी.. दरात सातत्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:19 AM

काजू उत्पादक देशांमध्ये यंदा काजू उत्पादनात ४० टक्के घट झाल्यामुळे काजूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

सुक्यामेव्यांमध्ये काजू हा स्वादिष्ट पदार्थ महाग झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून काजूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काजू उत्पादक देशांमध्ये यंदा काजू उत्पादनात ४० टक्के घट झाल्यामुळे काजूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

दोन महिन्यांच्या कालावधीत काजूच्या दरात किलोमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. काजूच्या सर्व जातींमध्ये सतत चढ उताराचा कल आहे. भारताव्यतिरिक्त आफ्रिकन देशांतील काजू उत्पादनावर सुमारे ८० टक्के परिणाम झाला आहे. काजूचा जुना साठा जवळपास संपला आहे.

रेस्टॉरंट्स, मिठाई बनवणारे आणि आईस्क्रीम बनवणाऱ्यांकडून काजूला जोरदार मागणी आहे. मात्र, काजू किरकोळ बाजारात १००० ते १२०० रुपये किलो दराने मिळत असल्याने कसा परवडेल, असा प्रश्न ग्राहक विचारत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तीनशे रुपयांची वाढप्रीमियम दर्जाच्या काजूंमध्ये, फक्त हलक्या सरासरी दर्जाचे काजू उपलब्ध आहेत. गेल्या महिनाभरापासून काजूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ९८० ते १२०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.

४० टक्के परिणामयंदा हवामान बदलाचाही मोठा फटका या पिकाला बसल्यामुळे स्थानिक उत्पादनातही मोठी घट आहे. काजू उत्पादक देशांमध्ये कीटकांच्या प्रादुर्भावामुळे काजू पिकाच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. भारतातील जमीन क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि केरळमध्येही थोड्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. येथेही काजू उत्पादनावर सुमारे ४० टक्के परिणाम झाला आहे.

प्रक्रिया करणारा देशभारत हा जगातील सर्वात मोठा काजू प्रोसेसर आहे. येथील काजूचे उत्पादनही बंपर आहे; परंतु ते जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कच्च्या काजूच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयव्हरी कोस्टचे नाव प्रथम येते. काजू प्रक्रियेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

पांढरं सोनं ओळखपांढरे सोने म्हणून हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाची परदेशातून होणारी आवक कमी आहे. आयव्हरी कोस्ट आणि बेनिन येथून कच्चे काजू येतात, ज्याचा रंग शुभ्र असतो. हा दिसायला जरी आकर्षक असला, तरी भारतातील विशेषतः कोकणातील काजू चवीला उत्कृष्ट आहेत.

गेली दोन महिन्यांमध्ये दोनशे रुपयांपेक्षा जास्त दर वाढले आहे, चांगल्या आणि उत्तम दर्जा असलेल्या काजूना जास्त मागणी आहे, मागणी तसा पुरवठा होत नसल्याने दर वाढले आहेत. - जितेंद्र लाड, सुकामेवा व्यापारी

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीभारतलागवड, मशागतकाढणी पश्चात तंत्रज्ञानफलोत्पादन