Join us

कांद्याबाबत काळजी नको; नाफेडच्या कांदाविक्रीबाबत निर्णय १५ सप्टेंबरनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 11:29 AM

नाफेडचा कांदा बाजारात येणार अशा चर्चांनी शेतकऱ्यांमध्ये दर पडण्याची धास्ती असली, तरी नाफेडने दिलेल्या पत्रकानुसार सदर कांदां बाजारात आणण्याबाबत १५ सप्टेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

मार्च महिन्यापासून अतिशय कमी भावामध्ये विकल्या जात असलेल्या कांद्याला मागील दहा दिवसांपासून थोडा चांगला भाव मिळू लागला आहे. जवळपास साठ टक्के कांदा खराब झाल्यामुळे आवक घटली आहे. त्यामुळे कांद्याचा तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा होत आहे. 

दुसरीकडे सरकार आता नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, नाफेडने एक पत्रक काढून १५ सप्टेंबरनंतर कांदा बाजारात विकण्याबाबत निर्णय होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

उन्हाळ कांद्याला जेमतेम दरडिसेंबर, जानेवारीमध्ये लागवड केलेला उन्हाळ कांदा विक्रीसाठी मार्चच्या सुमारास बाजारात येतो. तेव्हापासून कांदा जेमतेम भावात विक्री झाला आहे. कांद्याला मागचे चार महिने केवळ सातशे ते आठशे रुपये इतका दर मिळाला. त्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा जास्त दिवस टिकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यामुळे गोदामातील जवळपास चाळीस टक्के कांदा खराब झाला. काही शेतकऱ्यांचा संपूर्ण कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांद्याच्या आवकेत घट झाली. आता सरकार कांदाचे भाव रोखण्यासाठी नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नाफेडचा कांदा दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येदरवर्षी नाफेडचा कांदा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बाजारात येतो. यंदा आवक घटत असल्याने दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता दिसू लागली. कांदा दोन ते अडीच हजार लागल्याने सरकार असा निर्णय घेत असल्याचे संदेश व्हायरल होत असल्याने  शेतकऱ्यांमध्ये भाव घसरणीला लागण्याची चिंता आहे. 

टोमॅटोचीही आयात आणि भाव कोसळलेगेले काही दिवस टोमॅटोला चांगला भाव मिळत असताना सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करून देशांतर्गत बाजारात भाव कमी केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असताना महिन्यात बाजारात येतो. यंदा कांद्याचा आता नाफेडचा कांदा बाजारात आल्यास आपल्या कांद्याला भाव कमी मिळण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.

सध्या असे आहेत कांदा दरदरम्यान काल १३ ऑगस्ट २३ रोजी पिंपळगाव बसवंत बाजारपेठेत कांद्याला किमान ४०० ते कमाल दर २९०० रुपये होते, सरासरी २३५० रुपये प्रति क्विंटल मिळाले. विंचूर बाजार समितीत किमान १००० ते कमाल २५१३ व सरासरी २१५० इतके प्रति क्विंटल दर, लासलगाव बाजारसमितीत किमान ८००, कमाल २३९०, तर सरासरी २१५० दर मिळाले. महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून प्राप्त झालेले बाजारसमित्यांमधील दर पुढीलप्रमाणे.

बाजार समिती

आवक

(क्विंटलमध्ये)

किमान दर

कमाल दर

सरासरी

14/08/2023
पुणे -पिंपरी2170023001500
पुणे-मोशी41750020001250
13/08/2023
राहूरी3341620028001500
खेड-चाकण200100025001800
मंचर9564150032502375
सातारा230100024001700
राहता1201870033002000
जुन्नर - नारायणगाव1250030002000
जुन्नर -आळेफाटा11300150032102200
अकलुज330100035002500
पुणे9609100027001850
पुणे- खडकी37110016001350
पुणे -पिंपरी3070025001600
पुणे-मांजरी123160022001800
पुणे-मोशी455100020001500
कर्जत (नगर)6530022001300
पैठण235770032001900
कोपरगाव846035023502080
पारनेर2397630031001850
भुसावळ1190012001000
वैजापूर- शिऊर256930030002100
रामटेक20140016001500

...तर संपूर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलन : दिघोळेदहा-बारा दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंगद्वारे वाटावा. केंद्र सरकारने हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

गेल्या आठवडाभरापासून कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी सर्वसाधारण भाव कमीच आहे. बाजारात चांगल्या कांद्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे ८०० ते २३०० रुपयांचा भाव दिसत असला तरी सरासरी भाव तसा कमीच आहे. त्यामुळे काही काळ बाजारभाव वर-खाली राहण्याची शक्यता आहे.- बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव बाजार समिती

सहा महिने कमी भावात विकत असलेल्या कांद्याला काही दिवसांपासून भाव मिळू लागल्याने सरकार जर नाफेडचा कांदा बाजारात आणणार असेल तर ते चुकीचे आहे. शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने नाफेडचा कांदा बाजारात आणू नये.- गोकुळ गिते, संचालक, पिंपळगाव बाजार समिती

टॅग्स :कांदाशेतीलागवड, मशागत