Join us

कमी पाण्यात येणारं कोरडवाहू शेतीला वरदान असणारं आवळा पिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 5:05 PM

आवळा या फळपिकास हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिल्यास वर्षातून दोन हंगामात फळे मिळतात व उत्पादन वाढते. तसेच बिगर हंगामातील फळांना चांगला दरही मिळतो.

जेथे सिंचनाची सोय आहे, त्या ठिकाणी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिल्यास वर्षातून दोन हंगामात फळे मिळतात व उत्पादन वाढते. तसेच बिगर हंगामातील फळांना चांगला दरही मिळतो. आवळा हे एक औषधी गुणधर्म असलेले फळझाड आहे. त्यात सर्वात जास्त 'क' जीवनसत्त्व असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो.

त्यामध्ये च्यवनप्राश, आवळा चूर्ण, आवळा सिरप, आवळा सुपारीचा समावेश आहे. हे झाड काटक फळझाड असून, वरकस व क्षारपड जमिनीत चांगले येते. आवळा पिकासाठी कोरडे, समशितोष्ण कटिबंधातील हवामान चांगले मानवते.

हवामान कोकणातील दमट व उष्ण हवामानातही ते चांगल्या प्रकारे येते. आवळ्याची लागवड समुद्रसपाटीनुसार १३०० मीटर उंचीपर्यंत करता येते. आवळ्याचे झाड १० अंश ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकते.जमिनया पिकासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या आम्ल ते अल्कधर्मीय, मध्यम प्रकारच्या जमिनी मानवतात. हे पीक वरकस ते साधारण खारवट अशा हलक्या जमिनीतही घेता येते. परंतु, पाण्याचा निचरा न होणाऱ्या भारी जमिनी या पिकासाठी योग्य नाहीत.

जातीडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत कृष्णा, कांचन, एन. ए -७, एन. ए -१० आणि चकय्या या आवळ्याच्या सुधारित जातींची कोकणात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

अभिवृद्धी व लागवडया पिकात परपरागीकरण होत असल्याने अधिक फलधारणेसाठी दोन ते तीन जाती एकत्रित करून लावणे जरुरी आहे. आवळ्याची लागवड कलम लावून करावी. कलम करण्यासाठी डोळा किंवा मृदकाष्ठ कलम पद्धती वापरात.

लागवडीसाठी वापरलेली आवळ्याची जात, कलम व जमिनीचा मगदूर विचारात घेऊन दोन रांगा व दोन झाडांतील अंतर ७ ते १० मीटर ठेवावे. लागवडीसाठी मे महिन्यात १० मीटर लांबी, १० मीटर उंची, १० मीटर खोली आकाराचे खड्डे करून जातिवंत कलमांची लागवड करावी.

पाणी व्यवस्थापनकोरडवाहू क्षेत्रात आवळा लागवड फायदेशीर ठरत आहे. ही कलमे जगवण्यासाठी पहिली तीन वर्षे आवश्यकतेनुसर २० ते ३० लिटर पाणी हिवाळी व उन्हाळी हंगामात १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावीत.

पिकाचा कालावधीकलम किंवा डोळा भरून अभिवृद्धी केलेल्या आवळ्याच्या झाडापासून सुयोग्य व्यवस्थापनामध्ये चौथ्या वर्षापासून फळे मिळण्यास सुरुवात होते आणि ५० वर्षापर्यंत उत्पन्न मिळते. पूर्ण मोठ्या वाढलेल्या आवळ्याच्या एका झाडापासून १५ वर्षापासून स्थानिक जातीपासून ४० ते १०० किलो, तर सुधारित जातीपासून ६० ते १५० किलो फळे मिळतात.

अधिक वाचा: डाळिंबात कोणत्या बहारात मिळेल जास्त फायदा; कसे असते बहाराचे वेळापत्रक

टॅग्स :फलोत्पादनशेतीफळेपीकशेतकरीपीक व्यवस्थापनलागवड, मशागत