Join us

Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:08 AM

Tur महाराष्ट्रात खरीप हंगामात बांधावर तुरी लागवड शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळवून देऊ शकतात.

कोकणात तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचरांच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काहीअंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणूनही घेतले जाते. महाराष्ट्रात खरीप हंगामात बांधावर तुरी शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळवून देऊ शकतात.

आवश्यक जमीनतूर पिकाला मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी, मुळे खोलवर जाऊ शकणारी भुसभुशीत जमीन मानवते. खार आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

मशागतपहिले पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापरावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढण्यास मदत होते. नांगरणीनंतर कुळवणी करून ढेकळे फोडावीत व फळी मारून जमीन समपातळीत आणावी.

लागवडीसाठी वाणकोकण विद्यापीठाने कोकण तूर १, आयसीपीएल ८७, टी-२१, विपुला हे तुरीचे वाण विकसित केले आहे. १२० ते १५५ दिवसांत हेक्टरी १० ते १८ क्विंटल उत्पन्न मिळते.

बीजप्रक्रियापेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास २.५ ग्रॅम थायरम चोळावे व त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.

पेरणीची वेळतूर पिकाचा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच जून महिन्यात लवकरात लवकर करावी. कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे होत नाही, तसेच उत्पादनात घट येते.

लागवडीचे अंतर व बियाणेसलग पीक घ्यावयाचे असल्यास हलक्या जमिनीत ६० सेंटीमीटर बाय ७५ सेंटीमीटर तर मध्यम ते भारी जमिनीत ७५ सेंटीमीटर बाय ९० सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. वाणाच्या कालावधीत आणि पेरणी अंतरानुसार हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते.

खत व्यवस्थापन व आंतरमशागततुरीच्या सलग पिकासाठी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार ५० किलो पालाश पेरणीच्या वेळी बियाणाच्या खाली मातीत चांगले मिसळून द्यावे. पेरणीनंतर १० दिवसात नांगे भरावेत. तसेच आवश्यकता असल्यास विरळणी करावी. पिकात १५ ते २० दिवसांनंतर कोळपणी करावी. तसेच एक ते दोन बेण्या करून पीक ४५ ते ६० दिवसांचे होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

पाणी व्यवस्थापनतूर खरीप हंगामातील पीक असल्याने ते पावसावर वाढते. पावसात जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

पीक संरक्षणपीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगावरील माशी आणि काळे सोंडे या किडींमुळे ४० ते ५० टक्के नुकसान होते. या किडींचे नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापनाने करावे. अगोदरच्या पिकानंतर खोल नांगरणी, निंबोळी पेंड आणि सेंद्रिय खताचा वापर, पिकांची फेरपालट, आंतरपिके, मिश्रपिके, रासायनिक उपायांचा एकात्मिक वापर केल्यास किडींचे प्रमाण कमी राहते.

उत्पादनयोग्य व्यवस्थापनामुळे हेक्टरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते. (बांधावरील तुरीचे उत्पादन कमी असू शकते)

अधिक वाचा: Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

टॅग्स :तूरशेतीशेतकरीलागवड, मशागतपेरणीखरीपकोकणपीकपीक व्यवस्थापन