पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.
सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.
मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
कोकण वगळता समाविष्ट १४ जिल्हे
अहिल्यानगर, छ.संभाजीनगर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, वाशिम, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व बुलढाणा.
आंबा पिकासाठी प्रती हेक्टर संरक्षित रक्कम रु. आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे
संरक्षित रक्कम रु. | शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु. | |
नियमित विमा | १,७०,०००/- | ८,५००/- ते २१,२५०/- |
गारपीट | ५७,०००/- | २,८५०/- ते ४,८४५ |
हवामान धोका व कालावधी व प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)
१) अवेळी पाऊस (दि. १ जानेवारी ते ३१ मे)
या कालावधीमध्ये कोणत्याही सलग २ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ८,५००/- देय होईल.
या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ३ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २५,०००/- देय होईल.
या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ४ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ५१,०००/- देय होईल.
(कमाल देय रक्कम रुपये रु. ५१,०००/-)
२) कमी तापमान (दि. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी)
या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग ३ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २५,५००/- देय होईल.
(कमाल देय रक्कम रुपये रु. २५,५००/-)
३) जास्त तापमान (दि. १ मार्च ते ३१ मार्च)
या कालावधीमध्ये दैनदिन कमाल तापमान सलग ३ दिवस ४० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ४२,५००/- देय होईल.
(कमाल देय रक्कम रुपये रु. ४२,५००/-)
४) वेगाचा वारा (दि. १ एप्रिल ते ३१ मे)
(दि. २२/०१/२०२६ च्या शासन परिपत्रकान्वये नुकसान ठरविण्यासाठी पंचनामा कार्यपद्धती निश्चित केले नुसार विमा नुकसान भरपाई देय होईल.)
या कालावधीमध्ये वेगाचा वारा प्रति तास २५ कि.मी. व त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ५१,०००/- देय राहिल.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ५१,०००/-)
विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासुन ७२ तासात नुकसानग्रस्त आंबा पिकाची माहिती कृषि विभाग/विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे.
संबधित विमा कंपनी, महसूल, विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.
गारपीटसाठी दि. १ फेब्रुवारी ते ३१ मे
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
संपर्क
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.