Lokmat Agro >स्मार्ट शेती > Krushi Salla : अवकाळी पावसात पिकांची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Krushi Salla : अवकाळी पावसात पिकांची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Krushi Salla : latest news Read in detail how to take care of crops during unseasonal rains | Krushi Salla : अवकाळी पावसात पिकांची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Krushi Salla : अवकाळी पावसात पिकांची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Krushi Salla : वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. वाचा सविस्तर

Krushi Salla : वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच छत्रपती संभाजी नगर व जालना, बीड जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ५० ते ६० कि. मी.) राहून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

०३ एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्ह्यात तसेच परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  ०४ एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहुन हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच छत्रपती संभाजी नगर व जालना, बीड जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ५० ते ६० कि. मी.) राहून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. (Krushi Salla)

०३ एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्ह्यात तसेच परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  ०४ एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहुन हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पुढील ३ दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील ४ ते ५ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ४ ते १० एप्रिलदरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश :  वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.  

गहू : वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,  मळणी न केलेल्या व मळणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर मळणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.

हळद : सध्या हळदीची काढणी सुरु आहे. काढणी केलेल्या हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

उन्हाळी भुईमूग : उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमुग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) किडींना आकर्षित करण्यासाठी एकरी १० ते १२ पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समुहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.

उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टिन (३० पीपीएम) ३ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी : वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा.  काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनुसार सरी वरंब्याने पाणी द्यावे.

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.

आंबा :  काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत ००:००:५० १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

द्राक्ष : काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी.

भाजीपाला

वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. नविन लागवड व पुर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३  मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Web Title: Krushi Salla : latest news Read in detail how to take care of crops during unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.