Join us

Weather Update : अजुन किती दिवस आहे हा अवकाळी? वाचा संपूर्ण बातमी एका क्लीकवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 7:03 PM

आजपासून पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. 

महाराष्ट्रातील (संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) अशा २९ जिल्ह्यात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि.१८ मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी (गडगडाटीसह वीजा, वारा, गारा व धारा सह ) पावसाची शक्यता जाणवते. 

कोणत्या भागात व कोणत्या दिवशी गारपीटीच्या  शक्यता अधिक आहे ?              विशेषतः शनिवार दि.११ ते मंगळवार दि.१४ मे असे चार दिवस संपूर्ण  विदर्भ मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ) अशा २९ जिल्ह्यात मध्यम अवकाळी (गडगडाटीसह वीजा, वारा व गारा) पावसाची शक्यता अधिक जाणवते.    कोणत्या जिल्ह्यात विशेषतः अवकाळीचा जोर  अधिक जाणवेल?  रविवार दि.१२ ते मंगळवार दि.१४ मे पर्यंतच्या ३ दिवसात कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली ह्या आठ जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीच्या शक्यतेची तीव्रता अधिकच जाणवू शकते. 

मुंबईसह कोकणातही अवकाळीची शक्यता वाढली आहे काय?                महाराष्ट्रावरील 'वारा खंडितता' प्रणालीतून, समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत, तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर द्रोणीय आसाचा झोका, सध्या अधिक पश्चिमेकडे म्हणजे पार सह्याद्री पायथ्यापर्यंत कधी कधी पोहोचत असल्यामुळे, आजपासुन म्हणजे शनिवार दि.११ ते गुरुवार दि.१६ मे पर्यंतच्या सहा दिवसात मुंबई, उपनगरसह संपूर्ण कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग  अश्या ७ जिल्ह्यातही आता मात्र ढगाळ वातावरण राहून अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. 

अवकाळी आहे मग महाराष्ट्रात उष्णतेची स्थिती काय असेल?                 आजपासुन शनिवार दि.११ ते शनिवार दि.१८ मे पर्यंतच्या आठवड्यात  मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमानेही सरासरी इतके म्हणजे ३३ व २५ डिग्री से. ग्रेड  तर उर्वरित महाराष्ट्रात ते ४० व २६ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे असतील. लाट, दमटयुक्त उष्णता, किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता सध्या महाराष्ट्रात जाणवणार नाही,असे वाटते. 

            या अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रात कशामुळे वाढली आहे ? 

   (i) पश्चिम उत्तर प्रदेशातील मध्यभागातील क्षेत्रात  समुद्रसपाटीपासून दिड किमी.वर उंचीपर्यंत तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याची स्थिती व तसेच       (ii) या चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसाममधील हाफलॉंग व सिल्चर पर्यन्त,  समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यन्तच्या पातळीत पूर्व-पश्चिम पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या आस व त्यामुळे दोन्हीही समुद्रातून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे (iii) मराठवाडा ते कन्याकुमारी पर्यंतच्या वारा खंडितता प्रणाली व त्यातून तयार झालेला ९०० मीटर उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपीटीचे वातावरण तयार झाले आहे. 

            मतदानासाठी वातावरणीय दक्षता घेण्याची गरज आहे काय ?                   महाराष्ट्रातील लोकसभा चौथ्या टप्प्यातील मतदान सध्या सोमवार, दि.१३ मे रोजी असुन त्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता अधिक असल्यामुळे, मतदारांनी विशेषतः सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान उरकल्यास,  त्यांना अवकाळी वातावरणाचा  कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नसुन मतदान सुखकर व सोयीने होवु शकते, असे वाटते. 

लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे  

टॅग्स :हवामानशेतीशेती क्षेत्रमहाराष्ट्र