Join us

Girna Dam : गिरणा धरणात थेंबभर पाण्याचीही आवक नाही, किती जलसाठा शिल्लक?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:25 PM

Girna Dam Storage : जळगाव जिल्ह्याची (Jalgoan Dam) तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात (Girna Dam) थेंबभर पाण्याचीही आवक झालेली नाही.

जळगाव : यंदाच्या पावसाळ्यातील (Rainy Season) मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्र संपायला अवघे ६ दिवस राहिले असतानाही निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात (Girna dam) थेंबभर पाण्याचीही आवक झालेली नाही. यामुळे पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होत आहे. गेल्या २० दिवसांत गिरणा धरण परिसरात ११७ मिमी इतका अत्यल्प पाऊस झाला असून, शुक्रवारअखेर धरणात केवळ १२.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

गिरणा धरण हे नाशिक जिल्ह्यात (Nashik District) असले, तरी त्याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८८ पाणी पुरवठा योजनांचा एकमेव स्रोत हा गिरणा धरणच आहे. या धरणामुळे शेती क्षेत्रालाही समृद्धी मिळाली आहे. गेल्यावर्षी हे धरण फक्त ५६ टक्के भरले होते. याचा थेट फटका शेती क्षेत्राला बसला. सिंचनासाठी एकही आवर्तन दिले गेले नाही. पेयजलासाठीही फक्त चार आवर्तने मिळाली. त्यामुळे यंदा धरणावर आभाळमाया बरसावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाकाय जलस्रोतगिरणा धरणाची एकूण जलसाठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू असून, या महाकाय जलस्रोतातून १ लाख ४१ हजार ३६४ एकर क्षेत्र ओलिताखाली येते. उपयुक्त जलसाठा १८ हजार ५०० दलघफू आहे. धरणात पुरेसा जलसाठा झाला तर परिसरातील पाणी चिंता तर मिटतेच, परंतु शेतीलाही मोठा लाभ पेयजलासाठी चार आवर्तने दिली गेली असून, मृत तीन हजार दलघफू साठा वगळता शनिवारअखेर २२६४ दलघफू म्हणजेच केवळ १२.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमानामुळे धरणातील जलसाठा ५६ टक्क्यांवर स्थिरावला. यामुळे शेतीसाठी एकही आवर्तन दिले गेले नाही.

१८२ पाणीपुरवठा योजनांचा स्रोतगिरणा धरणातून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव व जळगाव या तालुक्यांमधील १७५ गावांना पाणीपुरवठा होतो. सोबतच चाळीसगाव शहर, मालेगाव, नांदगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. चाळीसगाव व मालेगाव औद्योगिक वसाहतींची चाकेही गिरणा धरणाच्या पाणीपुरवठ्यावरच फिरतात. एकूण १८२ पाणीपुरवठा योजनांना गिरणा धरणामुळेच संजीवनी मिळते. आवर्तनाचे पाणी काळनदा गावापर्यंत पोहोचते. सद्यस्थितीत उन्हाच्या तीव्रतेमुळेही धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे.

सलग चार वर्ष सेंच्युरी, गेल्यावर्षी हाफ सेंच्युरी गिरणा धरणाचे १९६९ मध्ये लोकार्पण झाले. १९७३ मध्ये गिरणा धरण पहिल्यांदा 'जलसंपन्न' झाले. गिरणा धरणाच्या ५५ वर्षांच्या काळात ते केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे. १९७३ मध्ये जलसंपन्न झालेले हे धरण १९७६ मध्ये प्रथमच १०० टक्के भरले. त्यानंतर २०१९ पासून ते २०२२ पर्यंत सलग चार वर्ष ते ओव्हरफ्लो झाले. गेल्यावर्षी मात्र ५६ टक्केच जलसाठा झाला आहे. त्यामुळे ते यंदा ओव्हरफ्लो व्हावे, अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :गिरणा नदीजळगावनाशिकहवामानधरणशेती