Join us

Maharashtra Weather Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, कुठे कुठला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 9:17 AM

मुंबईसह परिसराला झोडपून काढलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या प्रारंभी तो पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

मुंबई : मुंबईसह परिसराला झोडपून काढलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या प्रारंभी तो पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

आज १ ऑगस्टला रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

१ ते ४ ऑगस्ट या चार दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवार-रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकतो.

आतापर्यंत ओढ दिलेल्या प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. ५ ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो.

कुठे कधी कुठला अलर्ट■ २ ऑगस्ट : ऑरेंज - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर■ ३ ऑगस्ट : ऑरेंज - नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा■ ४ ऑगस्ट : ऑरेंज - रायगड

टॅग्स :पाऊसहवामानमुंबईकोकणमहाराष्ट्र