येलदरी : यंदा दमदार पाऊस (Rain) झाल्याने येलदरी धरणात मुबलक जलसाठा झाला आहे. जलसंपदा विभागाकडून दरवर्षी पाणी आवर्तनाचे नियोजन केले जाते.
यंदाही करण्यात आले असून रब्बी हंगामातील पिकांसाठी (For rabi season crops) सोमवारी (२१ जानेवारी) रोजी १ हजार ८०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्र सुरू झाले असून १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू झाली आहे.
रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून (Yeldari Dam)येथील जलविद्युत केंद्राच्या वीज निर्मिती केंद्राच्या तीन संचांपैकी दोन संचांमधून सोमवारी १८०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आलेले आहे.
हे पाणी येलदरी धरणाखालील पूर्णा नदीतून सिद्धेश्वर धरणात (Siddheshwar Dam) जाणार असून तेथून पुढे कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी मिळणार आहे.
पूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन सिद्धेश्वर धरणातून करण्यात येते. यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील ६० हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभरा, हळद, आदी पिकांसाठी व उन्हाळी हंगामातील भुईमूग, ऊस, केळी या पिकांसाठी पाणी मिळणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांनाही पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
आगामी काळात उन्हाळ्याचे दिवस सुरु होत अल्याने शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे. जेणेकरुन पुढील हंगामासाठी काही अडचणी येणार नाहीत.
२५० येलदरी येथून सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांनादेखील पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. पाच कालव्यांमधून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील मिळून ५७ हजार ९८८ हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे.
जलविद्युत निर्मिती केंद्र सुरू
* येलदरी येथील धरणातून पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येलदरी येथील जलविद्युत निर्मिती केंद्र देखील सुरू झाले असून तीन संचांपैकी दोन संच सुरू करण्यात आल्यामुळे १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू झाली आहे.
* यामुळे या विजेची भर राज्याच्या वीजनिर्मितीमध्ये देखील झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना या विजेचा देखील फायदाच होणार आहे.
* येलदरी केंद्रातून १५ मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.
पाच कालव्यांद्वारे विसर्ग
येलदरी धरणातून सोडण्यात आलेले पाणी सिद्धेश्वरमधून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या पाच कालव्यांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन करत आहे.
पाणी आवर्तनाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा, ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याची बचत करावी. - एस.बी. बिराजदार, कार्यकारी अभियंता
हे ही वाचा सविस्तर : Lower Dudhana Project : दुधनेच्या पाण्याचा हरभरा, गहू, ज्वारी पिकांना बुस्टर!