शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

महासभेच्या तीन जागांवरून वाद

By admin | Published: July 19, 2016 11:37 PM

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ३ सदस्य महासभेने नियुक्त करण्याचा शिवसेनेने घाट घातला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले आहे.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ३ सदस्य महासभेने नियुक्त करण्याचा शिवसेनेने घाट घातला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले आहे. महासभेतून ३ सदस्य निवडण्याबाबतचा आक्षेप नोंदवून घ्यावा. तसेच मनपाची खास सभा होण्यापूर्वी प्रभारी आयुक्तांनी पक्षीय संख्याबळ निश्चित करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिले आहेत.महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता खास सभा बोलविली आहे. या सभेत संख्याबळाच्या निश्चितीवरून घोळ होण्याची शक्यता आहे. नव्या संख्याबळ निश्चितीमध्ये राष्ट्रवादी आघाडीचा एक सदस्य कमी झाला आहे, तर शिवसेनेचा एक सदस्य वाढला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र कवडे यांनी संख्याबळाबाबत नगरसचिवांशी चर्चा करण्याचे सूचविले होते.स्थायी समितीमधील राष्ट्रवादीची एक जागा कमी झाल्याने गटनेते संपत बारस्कर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावेळी बारस्कर यांच्यावतीने अ‍ॅड. नितीन गवारे यांनी खंडपीठासमोर बाजू मांडली.महासभेतून ३ सदस्य नियुक्त करण्यास राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. राष्ट्रीय पक्ष असताना महासभेतून सदस्यांची नियुक्ती करू नये, अशी मागणीच याचिकेत करण्यात आली आहे. महासभेऐवजी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शिवसेनेच्या कोट्यातून एक सदस्य नियुक्त करावा. महासभेतून नियुक्ती करण्याबाबतचा आक्षेप प्रभारी आयुक्तांनी नोंदवून घ्यावा. त्यानंतर संख्याबळ निश्चित करावे आणि सभा सुरू करावी, असे आदेशात म्हटले आहे.दरम्यान काँग्रेसच्या गटनेत्या सुवर्णा कोतकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांची नावे पाकिटात द्यावीत, असे पत्र नगरसचिवांनी दिल्याचा दावा पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. कोतकर यांना पत्र दिले, मात्र बारस्कर यांना पत्रच मिळाले नसल्याची चर्चा आहे. सदस्य निवडण्याच्या घोळाबाबत आणि कोणते सदस्य स्थायीमध्ये पाठवायचे, याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षाच्या बैठका मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. सदस्य पदासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.(प्रतिनिधी)संख्याबळ निश्चितीबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक हे नगरसचिव मिलिंद वैद्य यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र वैद्य यांचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ होता. त्यामुळे शिवसेनेने नगरसचिवांना गायब केल्याचा विरोधी नगरसेवकांचा आरोप होता. मात्र आमच्याच नगरसचिवांना आम्ही कशाला गायब करू, असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने केला आहे. दरम्यान महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सध्या जिल्हाधिकारी यांच्याकडे होता, मात्र जिल्हाधिकारी विदेश दौऱ्यावर जात असल्याने कवडे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्याकडे पदभार सोपविला आहे. त्यामुळे नगरसेवकांचा वाद आता वालगुडे यांच्यासोबत चांगलाच रंगणार आहे.