शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

पद्मश्री विखे यांनी समाजाला दिशा दिली

By admin | Published: August 29, 2014 11:27 PM

शेती, सहकार आणि उद्योग या क्षेत्राला डॉ. विखे यांनी नवी दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.

अहमदनगर : शेतकऱ्यांचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस. पूर्वी शहराच्या विकासासाठी झटणारे अनेकजण होते. पण ग्रामीण भागाच्या विकासाची पोकळी भरून काढणारे कोणी नव्हते. या काळात सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतीय शेती, शेतकरी आणि उद्योजकाला नवीन प्रेरणा देण्यासाठी १९५० मध्ये आशिया खंडातील पहिल्या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली म्हणूनच शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना निर्माण झाला. शेती, सहकार आणि उद्योग या क्षेत्राला डॉ. विखे यांनी नवी दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. कार्यक्रमाला आत्माचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गिरमकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक राजेंद्र पाटील, वसंतराव कापरे, जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब शेलार, जिल्हा अधीक्षक अंकुश माने, उपसंचालक संभाजी गायकवाड, शिवाजी आमले, दिलीप देवरे, विष्णू जरे, विलास नलगे, डी.पी.देवरे, सबाजी गायकवाड आदी उपस्थित होते. कवडे म्हणाले, शेती, सहकार आणि उद्योग या क्षेत्रात नवनवीन परंपरा निर्माण करणाऱ्या पद्मश्री विखे पाटील यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून अनेक नवीन योजना राबविल्या. याव्दारे कारखाना कार्यक्षेत्रातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात लक्षणीय सुधारणा झाली. उपसा सिंचन योजना, पाझर तलाव, नदीवरील बंधारे या शिवाय अनेक छोट्या सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला. शेती सोबत जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक अधीक्षक माने यांनी केले.