शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

प्रत्येक महसुली गावात होणार सेंद्रिय शेतीचा प्रयोग

By admin | Published: February 25, 2016 12:09 AM

रासायनिक शेतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला बळ ...

कृषी विभागाची योजना : १०० टक्के अभियानावर राबविणार अभियान अमरावती : रासायनिक शेतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला बळ देण्यासाठी अभियान राबविले आहे. या योजनेत केंद्र व राज्य शासन अनुदान देणार आहे. पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खताचा बेसुमार वापर होत आहे. यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अहवालअंती स्पष्ट झाले आहे. यामुळे अनेक रोगांचा व शारीरिक व्याधी नागरिकांना होत आहे. अशीच स्थिती राहल्यास भविष्यात बिकट स्थिती येणार आहे. अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय कुठलाच पर्याय नाही याचा विचार करुन शासनाने शास्वत शेती अभियानांतर्गत व परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर सेंद्रिय शेती अभियान गावपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देणे तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय कृषी मालाला बाजारपेठ करुन देण्याची जबाबदारी आता शासनाने घेतली आहे. (प्रतिनिधी)