Join us  

Kiara Advani मुळे Ashneer Grover यांचे लग्न मोडले असते; समोर आले कटू सत्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 4:28 PM

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनला लोकांचे खूप प्रेम मिळाले. पहिल्या सीझनमध्ये अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) जज म्हणून होते.

नवी दिल्ली : काही रिअॅलिटी शो असे असतात की, त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते. असाच एक रिअॅलिटी शो म्हणजे शार्क टँक इंडिया. या रिअॅलिटी शोला लोकांची इतकी पसंती मिळाली की आता त्याचा दुसरा सीझनही आला आहे. या शोमध्ये नवउद्योजक आपल्या व्यवसायाच्या कल्पना घेऊन येतात. याशिवाय शोमध्ये जजही आहेत. त्यांच्यासमोर नवउद्योजक आपल्या व्यवसायाची कल्पना मांडतात आणि निधी उभारण्याचा प्रयत्न करतात. 

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनला लोकांचे खूप प्रेम मिळाले. पहिल्या सीझनमध्ये अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) जज म्हणून होते. तसेच, ते BharatPe चे माजी सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक होते. शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर ग्रोव्हर यांची जागा CarDekho चे संस्थापक अमित जैन यांनी घेतली आहे. दरम्यान, अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सध्या आपल्या दोगलापन: द हार्ड ट्रूथ अबाउट लाइफ अँड स्टार्ट-अप्स या पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 

या पुस्तकातील एका उताऱ्यात अशनीर ग्रोव्हर यांनी अभिनेत्री कियारा अडवाणीचाही (Kiara Advani) उल्लेख केला आहे. त्यांनी पुस्तकात सांगितले की, एक वेळ अशी आली होती की कियारा अडवाणीमुळे माझे आणि पत्नीचे नाते तुटणार होते. प्रकरण इतके पुढे गेले होते की नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. अशनीर ग्रोव्हर यांच्या या पुस्तकाने जीवनावर आणि त्यातील कटू सत्यावरही प्रकाश टाकला आहे. अशनीर ग्रोव्हर यांनी या पुस्तकात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

अशनीर ग्रोव्हर यांचा विनोद त्यांच्या पत्नीला आवडला नाहीदुसरीकडे, या खुलाशामुळे अशनीर ग्रोव्हर पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर (Madhuri Jain Grover) यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, नंतर अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या आईकडे पाहिले आणि म्हटले की, आजकाल बाजारात काय चालले आहे ते तुला माहिती नाही. आजच्या दिवशी लग्न झाले असते तर कियारा अडवाणीचे नाते तुझ्या मुलासाठी येते. अशनीर ग्रोव्हर यांच्या आईने या विधान एक विनोद म्हणून घेतले, तर त्यांची पत्नी माधुरी यांना यातील काहीही आवडले नाही.

30 मिनिटे भांडण पुढे, जेव्हा त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हरने कियारा अडवाणीबद्दलचे वक्तव्य ऐकले, तेव्हा तिने त्यांच्याशी बोलणे बंद केले. तसेच, विमानतळावर जाताना पत्नीने आपल्याशी 30 मिनिटे भांडण केले, असे अशनीर ग्रोव्हरने यांनी सांगितले. याशिवाय, अशनीर ग्रोव्हर यांनी सांगितले की, पत्नी माझ्यावर इतकी नाराज होती की तिने मला आठवण करून दिली की जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा मी काहीच नव्हतो. यासोबतच तिने कियारा अडवाणीसोबत लग्न करायचे आहे का, असे विचारले होते.

टॅग्स :कियारा अडवाणीव्यवसाय