Join us  

कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 1:18 PM

PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र-अपात्र आहेत, तसेच यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय? याबद्दल जाणून घ्या...

PM Vishwakarma Yojana : 'पीएम विश्वकर्मा' योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देणार आहेत. ही योजना गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी कारागिरांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. 

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी १८ प्रकारच्या व्यवसायातील १८ लाभार्थ्यांना टूलकिटचे वितरण करणार आहेत. तसेच, कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण देखील होणार आहे. 

दरम्यान, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकार गरजूंना ३ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते आणि विशेष म्हणजे या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही हमी देण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत काही नियम तयार करण्यात आले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही १८ प्रकारच्या व्यवसायांपैकी कोणत्याही एका व्यवसायाशी संबंधित असणे आवश्यक आहे. तर पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र-अपात्र आहेत, तसेच यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय? याबद्दल जाणून घ्या...

अशा प्रकारे कर्जाची रक्कम जाहीर केली जातेकोणतीही कुशल व्यक्ती पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. त्याला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांमध्ये मदत मिळण्यासाठी तो योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो. यामध्ये मोदी सरकारने ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद केली आहे, जी दोन टप्प्यांत दिली जाते. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत, व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, तर व्यवसाय सुरू केल्यानंतर, विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात लाभार्थीला २ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यासाठी जिथे अर्जदाराला कोणतीही हमी द्यावी लागणार नाही, तिथे अत्यंत सवलतीच्या ५ टक्के व्याजदराने हे कर्ज दिले जाईल.

कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्थाकुशल लोकांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे. या योजनेत केवळ कर्जच नाही तर इतरही अनेक फायदे दिले जातात, ज्यामध्ये विविध व्यवसायांशी संबंधित लोकांना त्या क्षेत्रात व्यवसाय स्थापन करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली असून प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंडचीही तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत एकीकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, तर दुसरीकडे त्याअंतर्गत ठरलेल्या १८ ट्रेडमधील लोकांचे कौशल्य आणखी वाढवण्यासाठी सुमारे एक आठवड्याचे प्रशिक्षणही दिले जाते. मास्टर ट्रेनर्स मार्फत दिले जाते. आणि यासोबतच दररोज ५०० रुपये स्टायपेंड देखील उपलब्ध आहे.

या योजनेसाठी कोण पात्र आहेत?या योजनेसाठी १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले अर्ज करु शकतात. यामध्ये बाहुली आणि खेळणी उत्पादक, न्हावी, वॉशरमन, शिंपी, मोची किंवा शू मेकर, फिशिंग नेट बनवणारे, टोपली/चटई/झाडू बनवणारे, गवंडी, बोट बांधणारे, सोनार, लोहार, शिल्पकार, दगड कोरणारे, दगड फोडणारे इत्यादी लोक योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

अर्ज करताना 'ही' कागदपत्रे आवश्यक...- आधार कार्ड- पॅन कार्ड- उत्पन्न प्रमाणपत्र- जात प्रमाणपत्र- ओळखपत्र- पत्त्याचा पुरावा- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र- बँक पासबुक- वैध मोबाईल नंबर अशाप्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता...- अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.- मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना दृश्यमान असेल.- येथे उपस्थित असलेल्या Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.- आता येथे तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.- नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.- यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.- भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.- आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

टॅग्स :नरेंद्र मोदीव्यवसायमहाराष्ट्र