Lokmat Money > बिझनेस न्यूज > आंध्र प्रदेशात रिलायन्स 50,000 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशात रिलायन्स 50,000 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 'आंध्र प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023' मध्ये ही घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:12 PM2023-03-03T17:12:23+5:302023-03-03T17:13:25+5:30

Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 'आंध्र प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023' मध्ये ही घोषणा केली.

Reliance Will Bring 50000 New Jobs In Andhra Pradesh Mukesh Ambani Announce | आंध्र प्रदेशात रिलायन्स 50,000 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशात रिलायन्स 50,000 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

रिलायन्स (Reliance) आंध्र प्रदेशात 50,000 नवीन रोजगार संधी निर्माण करेल आणि रिलायन्स रिटेल राज्यातून अधिकाधिक कृषी, कृषी-आधारित उत्पादने आणि इतर उत्पादने खरेदी करेल जेणेकरून आंध्रची उत्पादने देशभरात पोहोचतील. तसेच, रिलायन्स 10 गिगावॅट सोलर पॉवर प्लांट गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 'आंध्र प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023' मध्ये ही घोषणा केली.

आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत रिटेल सेक्टरमधील क्रांतीचा संदर्भ देताना, मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स रिटेलने आंध्र प्रदेशातील 6 हजार गावांमध्ये 1 लाख 20 हजारांहून अधिक किराणा व्यापाऱ्यांसोबत भागीदारी केली आहे. लहान व्यवसाय डिजिटल युगात भरभराट होण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज आहेत. रिलायन्स रिटेलने आंध्र प्रदेशमध्ये 20,000 हून अधिक प्रत्यक्ष नोकऱ्या आणि मोठ्या संख्येने अप्रत्यक्ष नोकऱ्या दिल्या आहेत.

रिलायन्स जिओबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, आंध्र प्रदेशसह संपूर्ण भारतात 2023 च्या अखेरपर्यंत जिओ ट्रू 5G चे रोलआउट पूर्ण केले जाईल. 40,000 कोटींहून अधिक गुंतवणुकीसह जिओने राज्यातील सर्वात मोठे आणि सर्वोत्कृष्ट डिजिटल नेटवर्क तयार केले आहे, ज्याद्वारे राज्यातील 98 टक्के लोकसंख्या कव्हर करता येते. जिओ ट्रू  5G अर्थव्यवस्थेला नवी गती देईल आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

रिलायन्स ही राज्याच्या आर्थिक ताकदीवर विश्वास ठेवणाऱ्या पहिल्या काही भारतीय कंपन्यांपैकी एक आहे. राज्यात आम्ही आमच्या KG-D6 बेसिन आणि त्याच्या पाइपलाइनवर 1,50,000 कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. लवकरच KG-D6 बेसिन भारताच्या एकूण गॅस उत्पादनात 30 टक्के योगदान देईल, असे आंध्र प्रदेशच्या प्रचंड आर्थिक क्षमतेचे कौतुक करताना मुकेश अंबानी म्हणाले.

याचबरोबर, आंध्र प्रदेशात शानदार उद्योग आणि उद्योगपतींची एक लांबलचक रांग आहे. विशेषत: फार्मा आणि पायाभूत सुविधांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंध्रमध्ये एक विशाल सागरी सीमा आहे, ज्यामुळे ते एक ब्लू इकॉनॉमीमध्ये बदलण्याची क्षमता आहे. नव्या भारताच्या विकासात आंध्र देश महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

Web Title: Reliance Will Bring 50000 New Jobs In Andhra Pradesh Mukesh Ambani Announce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.