Join us  

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी अलर्ट, वेळीच बघा नाहीतर होईल पश्चाताप! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 7:22 PM

State Bank of India: ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : आजच्या ऑनलाइन काळात बँकिंग क्षेत्रही मोबाईलवर अवलंबून झाले आहे. सर्वात मोठा व्यवहार (Money Transfer) असो किंवा घरबसल्या खरेदी असो, आता सर्व काही मोबाईलवर होते. अशा काळात सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) धोकाही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

अनेक फसवणूक करणारे लोक बँकर असल्याचे भासवून ग्राहकांना फोन करतात. यानंतर त्यांना आमिष दाखवून ओटीपी वगैरे मागतात. अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांना सतर्क केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना सावध केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, 'कोणतीही गोष्ट शेअर करणे ही देखभाल आहे. पण, जेव्हा OTP येतो तेव्हा तो कधीही इतर कोणाशीही शेअर करू नये.'

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेळोवेळी फसवणुकीच्या घटनांबद्दल सतर्क ठेवते. गेल्या काही वर्षांत बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. सध्याच्या काळात लोक शाखेत जाण्याऐवजी घरी बसून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. 

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फसवणुक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबत आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क करण्यासाठी बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया