Join us  

लाखो कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार! Income Tax'ने 'हा' नियम बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 11:47 AM

अधिसूचनेनुसार कर्मचार्‍यांना भाड्याशिवाय राहण्यासाठी नियोक्त्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आता खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. लाखो पगारदार करदाते आणि कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने भाडेमुक्त घरांशी संबंधित नियमांमध्ये काही बदलांबाबत अधिसूचना जारी केली आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या टेक होम म्हणजेच हातातील पगारात वाढ होणार आहे. शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेत, CBDT ने कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या भाड्याच्या मोफत घराबाबत सांगितले की, नवीन बदल पुढील महिन्यापासून लागू केले जातील.

अमेरिकन फर्मने अदानींच्या कंपनीत गुंतवणूक वाढवली! ब्लॉक डीलद्वारे शेअर्सची पुनर्खरेदी केली, ५.०३% हिस्सा

अधिसूचनेनुसार, कर्मचार्‍यांना भाड्याशिवाय राहण्यासाठी नियोक्त्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना, ज्यांना मालकांनी भाड्याने घर देण्याची सुविधा दिली आहे, ते आता पूर्वीपेक्षा जास्त बचत करू शकणार आहेत. कारण त्यांचा टेक होम पगार वाढणार आहे. नवीन तरतुदी १ सप्टेंबर २०२३ पासून लागू होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांच्या वगळून, त्यांना सुसज्ज निवास व्यवस्था प्रदान केलेल्या प्रकरणांमध्ये मूल्यांकन बदलेल. त्यांची मालकी मालकाकडे असते. नियम लागू झाल्यानंतर मूल्यांकनात बदल होणार आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पगाराच्या १० टक्के. यापूर्वी, २००१ च्या जनगणनेनुसार २.५ मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ते पगाराच्या १५ टक्के इतके होते. २०११ च्या जनगणनेनुसार, ४० लाखांपेक्षा कमी पण १५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पगाराच्या ७.५ टक्के एवढा. पूर्वी २००१ च्या लोकसंख्येच्या आधारे १० ते २५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे प्रमाण १० टक्के होते. या नवीन मूल्यांकनाच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारात वाढ होणार आहे.

आता या बदलाचा फायदा कर्मचाऱ्यांना कसा मिळू शकतो हे सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा एखादा कर्मचारी मालकाने दिलेल्या घरात राहत आहे. त्यासाठीची गणना आता नव्या सूत्रानुसार केली जाणार आहे. कारण आता दर कमी केले आहेत. म्हणजेच एकूण पगारातून कमी कपात केली जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हातातील पगार दरमहा वाढेल. नवीन नियम लागू झाल्यानंतर एकीकडे कर्मचाऱ्यांची बचत होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, सरकारच्या महसुलात घट होऊ शकते. जास्त उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा अधिक फायदा होईल, ज्यांना अधिक महाग घरे मिळतात.

टॅग्स :इन्कम टॅक्सकर