शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

मनाचिये गुंथी - गोड बोला, पण...

By admin | Published: January 13, 2017 12:19 AM

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते.

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते. विसरण्याची शक्यता असते तिथे आठवण करून देण्याची गरज असते. हा आठवण करुन देण्याचा कालावधी तीनशे पासष्ट दिवसांचा आहे. म्हणजे गोड बोलण्याचा संदेश वर्षभर आपल्या लक्षात राहू शकतो असा त्यामागे पूर्वसुरींचा अंदाज असणार. त्यात काही बदल करण्याची गरज आहे का, हे पाहिले पाहिजे. व्यवहाराला प्राथम्य देणारी नवी मूल्य व्यवस्था उदयाला आली असल्याने गोड या शब्दाला काही नव्या अर्थछटांचा स्पर्श झाला आहे का, हे पाहिले पाहिजे.सामान्यपणे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. गोड या शब्दाची दुसरी बाजू म्हणजे कडू ! गोड आणि कडू हे दोन्ही शब्द परस्परांना पूर्णत्व देण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. एकाला वगळून दुसऱ्याचा विचार करता येत नाही. म्हणजे गोडात थोडे कडू मिसळणे आलेच. कडू गोष्टी बऱ्याचदा औषधी असतात. औषध तर उघड उघड कडू असते, म्हणून त्याच्या गोळ्या साखरेत घोळून दिल्या जातात. औषध कडू असले तरी माणसाची प्रकृती सुधारावी म्हणून आवश्यक असते. हेच तत्व बोलण्यातही आपल्याला लागू करता आले पाहिजे. अती गोड म्हणजे विष आणि अती कडू म्हणजेसुद्धा विषच. त्यामुळे बोलताना या दोन्हीचे प्रमाण किती ठेवायचे याचे तारतम्य प्रत्येकाने बाळगले पाहिजे.आपण जरी गोड बोलत असलो तरी कधी ते तोंडदेखले, कधी वरवरचे, कधी तिरकस, कधी अतिशयोक्तीपूर्ण, तर कधी कुचेष्टापूर्ण देखील असू शकते. समोरच्या माणसाची आकलनक्षमता लक्षात घेऊनच यातील कोणता शब्दालंकार वापरायचा हे ठरवता आले पाहिजे, नाही तर गैरसमजुतीचा घोटाळा होणार हे नक्की ! एखाद्याच्या स्तुतीचा पतंग आकाशात उडवताना त्याचे जमिनीवरचे पाय तर सुटत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवणे हीसुद्धा आपली जबाबदारी ठरते.आपल्याविषयी इतरांनी गोड बोललेले आपल्याला आवडते मात्र आपण इतरांच्या बाबतीत तसेच वागतो का, याचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे. त्याही पलीकडे जाऊन तीळगुळ समारंभ हा केवळ एक उपचाराचा भाग तर झालेला नाही ना, हेही तपासून बघण्याची वेळ आली आहे. तोंडातली तीळगुळाची चव लुप्त व्हायच्या आतच माणसे पुन्हा कडू बोलायला सुरुवात करणार असतील तर रोजच्या रोज तीळगुळ समारंभ करूनही त्याला काही अर्थ राहणार नाही.- प्रल्हाद जाधव