Join us  

अजय-अतुल करणार चित्रपट निर्मिती

By admin | Published: January 21, 2016 2:21 AM

अगंबाई अरेच्चा, सावरखेड एक गाव, बंध प्रेमाचे, चेकमेट, बेधुंद, जोगवा, नटरंग, फँड्री असे एक सो एक मराठी तर गायब, विरुद्ध, सिंघम, अग्निपथ, पीके, ब्रदर्स

अगंबाई अरेच्चा, सावरखेड एक गाव, बंध प्रेमाचे, चेकमेट, बेधुंद, जोगवा, नटरंग, फँड्री असे एक सो एक मराठी तर गायब, विरुद्ध, सिंघम, अग्निपथ, पीके, ब्रदर्स या आणि अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांतील गाण्यांना संगीतबद्ध करून तमाम प्रेक्षकवर्गाल वेड लावणारी जोडी म्हणजे अजय-अतुल. या जोडीने आता नवीन इनिंग सुरू करायची ठरवली आहे. ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी प्रथमच दिग्दर्शन केलेल्या चित्रपटाची अजय-अतुल निर्मितीकरत आहेत. सामाजिक परिस्थितीवर उपहासात्मक रीत्या हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाची कथा स्वत: गिरीश कुलकर्णी यांनीच लिहिली आहे. दिलीप प्रभावळकर, रीमा लागू, मोहन जोशी, मनवा नाईक, भाऊ कदम, सविता प्रभुणे आणि स्पृहा जोशी असे एक से बढकर एक कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी ही जोडी संगीताप्रमाणेच चित्रपट निर्मितीतही उंचच उंच भरारी घेईल, याबद्दल शंकाच नाही.