सन १९८० मध्ये प्रदर्शित झालेला ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हा क्लासिक चित्रपट अनेकांना आठवत असेल. नसीरूद्दीन शहा आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाची त्या काळात प्रचंड चर्चा झाली होती. केवळ इतकेच नाही तर फिल्मफेअरच्या ‘क्रिटिक्स अवार्ड’ने या चित्रपटाला गौरविण्यात आले होते. आज हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटात येऊ घातलेला रिमेक, होय, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या चित्रपटाचा याच नावाने बनलेला रिमेक अखेर येत्या १२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खरे तर २०१५ पासून हा रिमेक बनून तयार होता. पण मार्केटींग आणि प्रमोशन बजट नसल्याने इतकी वर्षे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. पण अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत, आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
अखेर या तारखेला रिलीज होणार ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:36 IST
सन १९८० मध्ये प्रदर्शित झालेला ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हा क्लासिक चित्रपट अनेकांना आठवत असेल. आज हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटात येऊ घातलेला रिमेक
अखेर या तारखेला रिलीज होणार ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’
ठळक मुद्देनंदिता दास, मानव कौल,सौरभ शुक्ला हे दिग्गज कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटासाठी बजेट नव्हता. पण तो बनवण्याची जिद्द होती. याचमुळे या चित्रपटातील एकाही कलाकाराने फी घेतली नाही.