Join us  

Allu Arjun : 'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनचा वधारला भाव, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला मिळेना अभिनेत्याची डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 6:14 PM

Allu Arjun : 'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील मोठे निर्माते-दिग्दर्शक आता त्याला हिंदी सिनेमांमध्ये घेऊ इच्छित आहेत. पण, अभिनेता २०२६ पर्यंत व्यग्र आहे.

'पुष्पा' (Pushpa) फेम अल्लू अर्जुन(Allu Arjun)ला आज मोठ्या निर्मात्यांची मागणी आहे. केवळ टॉलिवूडचेच नाही तर बॉलिवूडच्या निर्मात्यांना अल्लू अर्जुनला त्यांच्या चित्रपटात घ्यायचे आहे. पण अडचण अशी आहे की अल्लू अर्जुनकडे पुढील तीन वर्षे वेळ नाही. त्याच्या तारखा 2025 च्या शेवटपर्यंत आणि 2026 च्या सुरुवातीपर्यंत बुक आहेत. अल्लू अर्जुन 'पुष्पा २' करत आहे. यासोबतच त्याच्याकडे एटली कुमार, वेणू श्रीराम, कोर्टाला सिवा आणि एस राजामौली यांसारख्या दक्षिणेतील अनेक दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट आहेत. अर्जुनकडे टॉलिवूडचे इतके चित्रपट आहेत की तो बॉलिवूड चित्रपट करण्याचा विचारही करू शकत नाही, हे स्पष्ट आहे.

अशा परिस्थितीतही अल्लू अर्जुनला बॉलिवूडच्या निर्मात्यांची ओढ लागली आहे. इथल्या सर्व तथाकथित मोठ्या निर्माते-दिग्दर्शकांना अल्लू अर्जुनला त्यांच्या चित्रपटात घ्यायचे आहे. संजय लीला भन्साळी अल्लू अर्जुनसोबत आपला पुढचा चित्रपट बनवण्याची योजना आखत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यासाठी त्यांनी मार्चमध्ये अल्लू अर्जुनसोबत भेटही घेतली. भेटीदरम्यान संजय लीला भन्साळी यांनी 'पुष्पा'मधील अल्लू अर्जुनच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अल्लूचे यापूर्वीचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. यासोबतच भन्साळींनी त्यांच्यासोबत पुढील चित्रपटाची आखणी करण्यात रस व्यक्त केला. मात्र अर्जुनने स्पष्टपणे सांगितले की, सध्या त्याच्याकडे तारखा नाहीत. अशा परिस्थितीत तो सध्या ज्या चित्रपटांमध्ये काम करतोय त्यामध्ये त्याला थोडा वेळ मिळाला तरच तो त्यांचा चित्रपट करू शकेल. अन्यथा तो २०२६ मध्येच संजय लीला भन्साळींसोबत चित्रपट करू शकेल.

संजय लीला भन्साळी यांच्याशिवाय बॉलिवूडमधील आणखी दोन मोठे निर्माते अल्लू अर्जुनला भेटल्याचे वृत्त आहे. परंतु समस्या केवळ तारखांच्या आहेत. अल्लू अर्जुनला चित्रपटाच्या ऑफर आणणाऱ्या सर्व निर्माता दिग्दर्शकांना अल्लू एक गोष्ट अधिक स्पष्टपणे सांगत आहे की तो संपूर्ण भारतातील स्टार आहे. त्यामुळे कोणत्याही किंमतीत बॉलिवूड अभिनेता या चित्रपटात सेकंड लीडची भूमिका करणार नाही. अर्जुनच्या सर्व अटी मान्य करण्यास बॉलिवूडकर तयार आहेत. अर्जुन मोकळा होण्याची ते वाट पाहतील. खरंतर अल्लू अर्जुनलाही बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवायचे आहेत. बॉलिवूड हे कोणत्याही प्रादेशिक स्टारचे स्वप्न असते. बॉलिवूडमध्ये आल्यानंतरच संपूर्ण देश त्याला ओळखतो. अल्लू अर्जुनलाही एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा