Join us

'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:25 PM

'सिंघम अगेन'सोबत vs 'भूल भूलैय्या ३'ची होणाऱ्या क्लॅशबद्दल कार्तिक आर्यन पहिल्यांदाच स्पष्ट बोलला (kartik aryan)

काहीच दिवसांमध्ये दिवाळीचा सण सुरु होईल. या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतील. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर बॉक्स ऑफिसवर दोन बिग बजेट सिनेमांची टक्कर बघायला मिळणार आहे. हे सिनेमे म्हणजे 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'. कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'भूल भूलैय्या ३' सिनेमाची 'सिंघम अगेन'सोबत टक्कर होणार आहे. बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या क्लॅशविषयी कार्तिक आर्यनने अखेर मौन सोडलंय. 

दोन सिनेमे आपापसात भिडणार, कार्तिक आर्यन म्हणाला-

'भूल भूलैय्या ३' सिनेमाची 'सिंघम अगेन'सोबत होणाऱ्या टक्करविषयी कार्तिक आर्यन म्हणाला, "दिवाळीला मोठी सुट्टी आहे. मला वाटतंय दोन्ही सिनेमे आरामात चालतील. सिंघम अगेनचा विषय हा अॅक्शनचा आहे तर आमच्या सिनेमाचा विषय हॉरर-कॉमेडीचा आहे. सध्या सिनेमा रिलीज होत नाहीयेत. त्यामुळे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. हा खूप दुर्मिळ योग आहे. प्रेक्षक ज्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहेत असे दोन सिनेमे दिवाळीत रिलीज होत आहेत. मला त्यांचा (अजय देवगण सिंघम) सिनेमा खूप आवडतो. मी तो सिनेमाही बघायला जाईल. मला आशा आहे की तुम्ही 'भूल भूलैय्या ३' सुद्धा बघाल. दोन्ही सिनेमे व्यवस्थित चालण्याचा खूप स्कोप आहे."

सिंघम अगेन vs भूल भूलैय्या ३ ची टक्कर

'भूल भूलैय्या ३' दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी भिडणार आहे. २००७ साली 'भूल भुलैय्या'चा पहिला भाग आला होता. तर २०२२ साली याचा सीक्वेल आला होता. पहिल्या भागात अक्षय कुमारने सर्वांचं मन जिंकलं होतं. तर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यननेही कमाल केली होती. आता तिसऱ्या भागात विद्या बालनने कमबॅक केलं आहे तर माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आता अनिल कपूरची 'भूल भूलैय्या ३'मध्ये एन्ट्री होणार का, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

टॅग्स :कार्तिक आर्यनभूल भुलैय्याअजय देवगणरोहित शेट्टी