Join us  

Bigg Boss 12 : करणवीर बोहरा आणि रोमिल-न‍िर्मल पोहचले कालकोठरीत,नॉमिनेशन लिस्टमध्येही आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 5:36 PM

कृति आणि रोशमी कॅप्टन बनण्याने खान सिस्टर्सला काही रुचले नाही, ज्यामुळे किचनमध्ये भांडणदेखील बघावयास मिळाले.

या सीझनच्या पहिल्या कॅप्टनच्या टास्कचा खूपच नाटकीय स्वरुपात कालचा शेवट झाला. शुक्रवारची सकाळ मात्र ‘हम तुम एक कमरे मे बंद हो...’ ने झाली. मात्र यावरुन कुणालाच काही समजले नाही की घरात काय होणार आहे. कॅप्टन्सी टास्कच्या रिझल्टनंतर घरातील स्पर्धक आता नवे कॅप्टन कृति आणि रोशमी मागे लागले आहेत. कृति आणि रोशमी कॅप्टन बनण्याने खान सिस्टर्सला काही रुचले नाही, ज्यामुळे किचनमध्ये भांडणदेखील बघावयास मिळाले.

कॅप्टन कृतिने आपले बॉसी नेचर दाखवत सबा खानशी वाद घातला. पहिल्या आठवड्याचे शेवटचे आणि कठोर टास्कही करण्यात येईल. स्पर्धकांनी खराब प्रदर्शन केल्याने बिग बॉस ‘कालकोठरी’ मध्ये टाकण्याची घोषणा करतो, ज्याने एक जोडी आणि एक सिंगल असे तीन स्पर्धकांना कालकोठरीची सजा मिळणार आहे. 

स्पर्धकांनी आपसातील तर्क-वितर्क आणि सहमतीने करणवीर वोहरा, रोमिल आणि निर्मलचे नाव घेतले. बिग बॉसने कालकोठरीमध्ये जाणा-या सदस्यांना पुढील आठवड्यासाठी सरळ सरळ नॉमिनेट होण्यासाठी जाहिर केले. 

भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’  नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व  आहे.  भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय.

टॅग्स :बिग बॉस 12करणवीर बोहरा