Join us  

​संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने 'या' अभिनेत्रीने आयुष्यभर केले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2017 11:43 AM

संजीव कुमार हे एक प्रतिभाशाली अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आंधी, शोले, खिलोना यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले ...

संजीव कुमार हे एक प्रतिभाशाली अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आंधी, शोले, खिलोना यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. संजीव कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये सुलक्षणा पंडित यांच्यासोबत काम केले आहे. संजीव कुमार आज हयात नाहीत. पण एकेकाळी सुलक्षणा पंडित त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. संजीव कुमार यांनी नकार दिल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि ही गोष्ट सुलक्षणाची बहीण विजेता पंडित यांनी स्वतः मीडियाला सांगितली आहे.सुलक्षणा अनेक वर्षांपासून बिछान्याला खिळलेल्या असल्यामुळे त्या त्यांची बहीण विजेतासोबतच राहातात. विजेता यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सुलक्षणा दीदी तिचा अनेकवेळ तिच्या रूमममध्येच घालवते. संजीव कुमार यांनी प्रेमाचा स्वीकार न केल्याने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले आणि त्यात संजीव कुमार यांचा अतिशय कमी वयात मृत्यू झाल्याने तिचे मानसिक संतुलन अधिकच बिघडले. संजीव कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षं दीदी एकटीच राहात होती. पण तिची तब्येत अधिक ढासळल्याने मी तिला घरी घेऊन आले. तेव्हापासून ती माझ्यासोबतच राहात आहे. काही वर्षांपूर्वी ती बाथरूममध्ये पडली होती आणि त्यामुळे तिच्या कंबरेला जबर मार बसला होता. तेव्हापासून तिला धड चालता देखील येत नाही. ती अथंरुणालाच खिळून आहे. तिला कोणालाही भेटायला आवडत नाही. तसेच ती कोणाशी जास्त बोलतदेखील नाही. संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. उलझन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुलक्षणा संजीव कुमार यांच्या प्रेमात पडली. पण संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडत असल्याने त्यांनी सुलक्षणाला नकार दिला. यामुळे सुलक्षणा डिप्रेशनमध्ये गेल्या.