Join us  

Akshay Kumar: सैनिकांचा अपमान झाल्यावर अक्षय कुमार खवळला, रिचा चढ्ढाला चांगलंच सुनावलं, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 6:26 PM

अभिनेत्री रिचा चड्डानेभारतीय सैन्याविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे.

मुंबई : अभिनेत्री रिचा चड्डाने भारतीय सैनिकांविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एक ट्विट करून रिचाला चांगलेच सुनावले आहे. ते आहेत म्हणून आपण आहोत असे म्हणत अक्षयने याप्रकरणावर भाष्य केले. 

अक्षय कुमारने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "हे पाहून त्रास होतो. कोणत्याही गोष्टीने आपल्याला आपल्या सशस्त्र दलांबद्दल कधीही कृतघ्न बनवता कामा नये. ते आहेत म्हणून आज आपण आहोत". अक्षय कुमारने भारतीय सैनिकांचे महत्त्व स्पष्ट करताना रिचा चढ्ढाला चांगलेच सुनावले.

काय होतं रिचाचं ट्विट? भारतीय सेनेचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानावर रिचाने प्रतिक्रिया दिली आहे. लेफ्टिनंट जनरल म्हणाले, "जर सरकारने आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत." यावर रिच्चाने एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट केले, "Galwan says hi", अर्थात गलवान हाय म्हणत आहे. खरं तर याप्रकरणी भाजप नेते मंजिंदर सिंह यांनी रिचावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुंबई पोलिसांना केली आहे. रिचाचे विचार हे भारतविरोधी आहेत. ती राहुल गांधींची समर्थक आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

1 मे 2020 रोजी गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यामध्ये झटापट झाली होती. यात भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. चीनचे 35 ते 40 सैनिक मारले गेले. हा आकडा चीनने लपवलाही होता. यानंतर आजतागायत भारत आणि चीनचे संबंध बिघडलेले आहेत.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अक्षय कुमाररिचा चड्डाभारतीय जवानबॉलिवूडभाजपा