Join us  

अभिषेकसोबत सात फेरे घेण्यापूर्वी ऐश्वर्या रायने झाडासोबत केले होते लग्न?, यावर अभिनेत्री म्हणाली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 5:13 PM

Aishwarya Rai-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केले. मात्र तिने अभिषेकसोबत सात फेरे घेण्याआधी झाडासोबत लग्न केल्याचे बोलले जात होते.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा भाग असते. अलीकडेच सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने जहीर इक्बालसोबत लग्न केले, ज्याने सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळवली. पण आज आपण सोनाक्षी-जहीरबद्दल नाही तर ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या लग्नाशी संबंधित एका अफवेबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे ऐश्वर्याला परदेशातही त्याचा सामना करावा लागला होता. ऐश्वर्या रायने अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी एका झाडाशी लग्न केले होते, अशी अफवा सर्वत्र पसरली होती.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केले. यादरम्यान, एक अफवा पसरली ज्यामुळे नंतर ऐश्वर्याला लाज वाटली. मंगळ दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्या रायला अभिषेकसोबत सात फेरे घेण्यापूर्वी झाडाशी लग्न करावे लागले, अशी अफवा पसरली होती.

या अफवेवर ऐश्वर्या रायची प्रतिक्रियाऐश्वर्या रायने २००८ मध्ये एनडीटीव्हीशी मुलाखत देताना या अफवेवर प्रतिक्रिया दिली होती. मुलाखतीत ऐश्वर्याला झाडाशी लग्न करण्याच्या अफवेबद्दलही विचारण्यात आले होते. ज्यावर अभिनेत्री म्हणाली होती की, 'मला ही अफवा इतकी निरुपयोगी वाटली की मला त्याबद्दल उत्तर देणं गरजेचं वाटलं नाही, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचं कुटुंब इतकं सॉलिड आहे की आम्ही सगळ्या गोष्टी कुटुंबाती मुख्य सदस्यावर सोडून दिल्या. पापा (अमिताभ बच्चन) लग्नानंतर मीडियाला योग्य वेळी भेटले आणि सर्व प्रश्नांची उत्तरेही दिली.

परदेशात व्हावे लागले लाजिरवाणेऐश्वर्या रायने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, 'जेव्हा तुम्हाला आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये याबद्दल विचारले जाते तेव्हा ते धक्कादायक होते.' अभिनेत्री पुढे म्हणाली की 'जेव्हा तुम्ही परदेशात प्रवास करता तेव्हा अनेक वेळा तुम्हाला आंतरराष्ट्रीय मीडियासमोर यावे लागते, त्यादरम्यान त्यांनी विचारले की तुम्ही झाडाशी लग्न केले का? आणि तुला मोठा शाप मिळाला आहे का? मग मी विचार करू लागले, अरे देवा, मी कुठून सुरुवात करू?

अमिताभ बच्चन म्हणाले होते... या अफवेवर अमिताभ बच्चन यांनी २००७ मध्ये टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. अमिताभ बच्चन म्हणाले होते की, 'ते आणि त्यांचे कुटुंब अंधश्रद्धाळू नाहीत आणि त्यांनी ऐश्वर्याची कुंडलीही पाहिली नाही.' तसेच अमिताभ म्हणाले होते की, 'झाड कुठे आहे? कृपया मला दाखवा. तिने फक्त माझ्या मुलाशी लग्न केले आहे. जर तुम्हाला वाटतंय तर ते झाड म्हणजे अभिषेक.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन