Join us  

Arijit Singh Birthday : अरिजीत सिंगच्या दुसऱ्या लग्नाची हटके गोष्ट, अनोखी आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 8:00 AM

Arijit Singh Birthday :  2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे अरिजीत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला. आज अरिजीतचा वाढदिवस.

Arijit Singh Birthday : तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, यांसारखी अनेक हिट गाणी गाणारा बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंग (Arijit Singh) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.  2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे अरिजीत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला. आज तुमच्या याच आवडत्या गायकाचा वाढदिवस. (Arijit Singh Love Story)

अरिजीतच्या गाण्यांबद्दल त्याच्या करिअरबद्दल आपण सगळेच जाणतो. पण त्याच्या पर्सनल लाईफबद्दल किती जणांना ठाऊक आहे? एका घटस्फोटित, एका मुलाची आई असलेल्या महिलेला अरिजीतने पत्नी म्हणून स्वीकारलं. बिनशर्त प्रेम काय असतं, हे त्याने जगाला दाखवून दिलं. अरिजीत त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फार क्वचित बोलतो. फार कमी लोकांना ठाऊक आहे की, अरिजीतची दोन लग्न झाली आहेत.

2013 साली एका रिअ‍ॅॅलिटी शोदरम्यान भेटलेल्या रूपरेखा बॅनर्जीसोबत त्याने पहिलं लग्न केलं होतं. ‘गुरूकुल’च्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. रूपरेखा ही सुद्धा या शोमध्ये स्पर्धक होती. येथून पुढे दोघांत मैत्री झाली आणि पुढे दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2013 मध्ये दोघांनीही लग्न केलं होतं. अर्थात मतभेदांमुळे हे लग्न टिकू शकलं नाही. अगदी लग्न झालं त्याच वर्षी हे दोघे वेगळे झाले होते.

2014 मध्ये अरिजीतने त्याची बालपणीची मैत्रिण कोयल रॉयसोबत दुसरं लग्न केलं. कोयल व अरिजीत सुरुवातीपासून एकमेकांवर प्रेम करत होते. पण काही कारणास्तव दोघांचं लग्न होऊ शकलं नव्हतं. एका दुस-याच व्यक्तिसोबत कोयलचं लग्न झालं होतं. त्याच्यापासून कोयलला एक मुलगा होता. पण कोयलचे वैवाहिक आयुष्यात फार काही ठीक नव्हतं. अखेर कोयलने पहिल्या पतीला घटस्फोट देत अरिजीतसोबत दुसरा संसार थाटला. अरिजीतने कोयलच्या पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाचाही स्वीकार केला. आता कोयल व अरिजीत दोघेही आनंदात जगत आहेत. एकमेकांसोबत आनंदी आहेत.

अरिजीत सिंहने फेम गुरूकुल या कार्यक्रमाद्वारे त्याच्या  कारकिदीर्ला सुरुवात केली होती. हा रिअ‍ॅलिटी शो तो जिंकू शकला नाही. पण या रिअ‍ॅलिटी शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. ‘सावरियाँ’ या चित्रपटातील एक गाणं त्याने गायलं होतं. अर्थातकाही कारणास्तव हे गाणं प्रदर्शित झालं नाही. मात्र यानंतर अरिजीतला कामं मिळत गेली. आज अरिजीतने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत.  

टॅग्स :अरिजीत सिंहबॉलिवूड