Join us  

...या कलाकारांनी पडद्यावर दाखविला बळीराजाचा संघर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 10:57 AM

जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा जेव्हा संपावर जातो, तेव्हा काय होऊ शकते याचा अनुभव सबंध महाराष्ट्राने घेतलाच. शिवाय ...

जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा जेव्हा संपावर जातो, तेव्हा काय होऊ शकते याचा अनुभव सबंध महाराष्ट्राने घेतलाच. शिवाय बळीराजाचा संघर्ष हा आरपार असतो, हेही यानिमित्त दिसून आले. वास्तविक बळीराजाला आपल्या मागण्यासाठी नेहमीच लढा द्यावा लागला आहे. त्याचे प्रतिबिंब चित्रपटांमध्येही उमटले आहे. मराठीत तर आजही बळीराजाला केंद्रबिंदू ठेवून दरवर्षाला किमान अर्धाडझन तरी चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. तसेच बºयाचशा बॉलिवूडपटांमध्येही शेतकºयांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...सोहेल खान (किसान)आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारणाºया अभिनेता सोहेल खान याने शेतकºयाची भूमिकाही साकारली आहे. ‘किसान’ या चित्रपटात तो शेतकºयांची बाजू मांडताना दिसतो. सोहेल खान याच्याच प्रॉडक्शन हाउसअंतर्गत निर्मित या चित्रपटात ‘शेतकºयांच्या आत्महत्या’ हा संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ व अरबाज खान यांनी सोहेलच्या वडील आणि भावाची भूमिका साकारली आहे. आमीर खान (लगान)मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमीर खान यानेही शेतकºयाची भूमिका साकारली आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘लगान’ या चित्रपटात तो एका शेतकºयाच्या भूमिकेत झळकला होता. दुष्काळात होरपळलेला शेतकरी अन् ब्रिटिश राजवट यांच्यामधील संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात क्रिकेटचा संदर्भ देऊन त्याकाळी शेतकºयांनी ब्रिटिशांना दिलेला लढा दाखविण्यात आला. सलमान-शाहरूख (करण-अर्जुन)सलमान खान, शाहरूख खान अभिनित ‘करन-अर्जुन’ हा चित्रपट एक ड्रामा आहे. परंतु अशातही यामध्ये सलमान आणि शाहरूख शेतकºयाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. पहिल्या जन्मात ते शेतकरी असून, शेती करताना बघावयास मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले आहे. मनोज कुमार (उपकार)१९६७ मध्ये आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटात मनोज कुमार यांनी शेतकºयाची अतिशय अविस्मरणीय अशी भूमिका साकारली होती. सुरुवातीच्या काळात शेतकरी असलेले मनोज कुमार भारत-पाक युद्धादरम्यान सैन्यात दाखल होतात. ‘जय जवान-जय किसान’ या घोषणेने प्रेरित असलेल्या या चित्रपटाचे मनोज कुमार यांनीच दिग्दर्शन केले आहे.  नर्गिस दत्त (मदर इंडिया)१९५७ मध्ये आलेला महबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ या चित्रपटाचा भारतीय सिनेमा जगतातील कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये समावेश केला जातो. आॅस्कर अवॉर्डपर्यंत बाजी मारलेल्या या चित्रपटात राज कुमार आणि नर्गिस दत्त यांनी शेतकºयांची भूमिका बजावली. तर त्यांच्याच मुलांच्या भूमिकेत असलेल्या सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांची भूमिकाही अविस्मरणीय ठरली. गरिबी, उपासमार आणि सावकारीच्या पाशात अडकलेल्या शेतकºयांची कथा या चित्रपटातून दाखविण्यात आली. बलराज साहनी (दो बीघा जमीन)१९५३ मध्ये रिलीज झालेला बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बीघा जमीन’ हा चित्रपट शेतकºयांची व्यथा मांडणारा आहे. दुष्काळ, गरिबी, शेतकºयांवर सावकारांकडून होत असलेला अत्याचार आदी मुद्दे चित्रपट अतिशय ज्वलंतपणे मांडण्यात आले आहेत. चित्रपटात बलराज साहनी यांनी शेतकºयाची भूमिका साकारली आहे.