Join us  

जया बच्चनच्या 'या' ४ शब्दांमुळे झाला रेखा-अमिताभच्या ब्रेकअप? जाणून घ्या, काय घडलं त्या भेटीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 5:28 PM

Jaya bachchan: जया आणि अमिताभ यांच्या संसाराला तीन वर्ष होत असतानाच त्यांच्या आयुष्यात रेखाची एन्ट्री झाली.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि रेखा (rekha). गेल्या कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या या जोडीच्या अफेअर्सचे अनेक किस्से चर्चिले गेले. किंबहुना अद्यापही त्यांची चर्चा रंगते. यात खासकरुन त्यांच्यातील प्रेम, त्यांच्या आलेला दुरावा अशा किश्यांची चर्चा वरचेवर चाहत्यांमध्ये रंगताना दिसते. यामध्येच आता रेखा आणि बिग बी यांच्या नात्यात नेमका कशामुळे दुरावा आला यामागचं कारण समोर आलं आहे. जया बच्चन यांनी रेखाला घरी बोलावून तिच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर रेखाने बिग बींपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन आज त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविषयीच्या अनेक चर्चा रंगत आहेत. यामध्येच त्यांनी रेखाला घरी बोलावून साधलेल्या संवादाची चर्चा रंगली आहे. जया आणि अमिताभ यांच्या संसाराला तीन वर्ष होत असतानाच त्यांच्या आयुष्यात रेखाची एन्ट्री झाली. 'दो अनजाने' सिनेमाच्या सेटवर रेखा-अमिताभ यांची पहिली भेट झाली. या भेटीनंतर त्यांची जोडी हळूहळू चाहत्यांना आवडू लागली होती. इतकंच नाही तर पडद्यावर हिट ठरत असलेल्या या जोडीची ऑफस्क्रीनही चर्चा रंगू लागली होती. या चर्चा जया बच्चन यांच्या कानावर पडत होत्या. ज्यामुळे त्यांनी रेखाची भेट घ्यायचं ठरवलं.

किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात

काय घडलं जया-रेखाच्या भेटीत

'सिलसिला' या सिनेमामध्ये रेखा, जया आणि अमिताभ हे तिघे मुख्य भूमिकेत झळकले होते. हा सिनेमा या तिघांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित आहे अशाही त्या काळात चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या चर्चा जया बच्चन ऐकत होत्या. त्यामुळे रेखाशी बोलण्याची त्या संधी पाहात होत्या. अशातच बिग बी एका शूटसाठी बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत त्यांनी रेखाला आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं.

47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क

जया यांच्या घरी रेखा जरा घाबरतच गेली होती. कदाचित पुढे काय होणार याची तिला भनक लागली होती. रेखा आणि जया यांची भेट झाल्यावर सुरुवातीला दोघींनी छान मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारल्या. त्यानंतर जया यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रेखाच्या पायाखालची वाळू सरकली.

काय होते जया बच्चनचे शब्द

रेखा-जया यांचं जेवण, गप्पा सारं काही आटोपल्यानंतर रेखा तिच्या घरी जायला निघाली. याचवेळी काही झालं तरीसुद्धा मी अमिताभला सोडणार नाही, असं जयाने ठामपणे सांगितलं. तिच्या या वाक्याने रेखा पुरती समजून गेली. आणि, तेव्हापासून तिने अमिताभपासून लांब राहण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :जया बच्चनरेखाअमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा