Join us  

साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 4:44 PM

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी बॉलिवूडच्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील बरेच कलाकार सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहे. या सेलिब्रेटींना हिंदी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. मात्र असेही काही कलाकार आहेत, ज्यांना बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर येत असतात. पण त्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतला सर्वात मोठा अभिनेता आहे. पण त्याने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. अल्लू अर्जुनला ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘८३’ या सुपरहिट चित्रपटांची ऑफर आली होती, पण त्याने हे दोन्ही चित्रपट नाकारले होते. मल्याळम चित्रपट स्टार दुलकर सलमान तापसी पन्नू, विकी कौशल आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘मनमर्जिया’ या चित्रपटाद्वारे हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार होता. त्याने हा चित्रपट साइन केला होता, पण नंतर त्याच्या जागी अभिषेक बच्चनची वर्णी लागली.

अभिनेता महेश बाबूने आजवर एकाही बॉलिवूड चित्रपटात काम केलेले नाही. त्याला देण्यात आलेली ऑफर तो दरवेळी नाकारतो. अभिनेता विजय देवरकोंडाच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाला खूप लोकप्रियतामिळाली, या चित्रपटानंतर यशराज फिल्म्स विजय देवरकोंडा याला त्यांच्या चित्रपटात कास्ट करणार होते, पण त्यानेही ही ऑफर नाकारली होती. 

अभिनेत्री अनुष्का शेट्टीला बऱ्याचदा बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण, प्रत्येक वेळी तिने त्या नाकारल्या, अजय देवगणच्या ‘सिंघम’ या चित्रपटासाठीही तिला विचारण्यात आले होते. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असली तरी तिने शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ चित्रपट नाकारला होता. ‘लायन’ या मूळ तमीळ चित्रपटासाठी अभिनेत्री समंथाला संपर्क साधण्यात आला होता, पण तिने या चित्रपटाची ऑफर नाकारली, नंतर तिच्या जागी नयनताराला ही भूमिका देण्यात आली.

टॅग्स :महेश बाबूविजय देवरकोंडारश्मिका मंदानाअनुष्का शेट्टीअल्लू अर्जुन