Join us

'हीरामंडी'मधून मिळाली प्रसिद्धी, तरीदेखील अदिती राव हैदरीला मिळत नाही काम, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:27 IST

Aditi Rao Hydari : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीला 'हीरामंडी'(Heeramandi Web Series)मधून चांगलीच लोकप्रियता मिळाली.

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) २०२४ सालातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक होती. यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे अभिनेता सिद्धार्थसोबत तिचे लग्न. पण त्याआधी तिची 'हीरामंडी'(Heeramandi Web Series)मधील गजगामिनी चाल चर्चेत आली होती. प्रत्येकजण तिची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. बरेच रिल गजगामिनी चालीचे पाहायला मिळाले. अभिनेत्रीची तुलना मीना कुमारीशी केली जात होती. मात्र, तिच्या कामाचा कोणताही फायदा तिला झाला नाही. या मालिकेनंतर कोणतीही ऑफर आली नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले.

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने फराह खानच्या व्लॉगमध्ये खुलासा केला की, तिचा पती आणि अभिनेता सिद्धार्थशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यास तिला एक सेकंदही लागला नाही. 'हीरामंडी'च्या यशाचा त्याच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही, असेही सांगितले. व्लॉगमध्ये दोघांनी अभिनेत्रीची आवडती हैदराबादी डिश 'खगीना' तयार केली आणि त्याची रेसिपीही शेअर केली.

सिद्धार्थसोबतच्या लग्नावर आदिती म्हणाली? व्लॉगमध्ये फराहने आदितीला विचारले की, तो कोणता क्षण आहे जेव्हा तिने सिद्धार्थशी लग्न करायचे ठरवले. यावर अभिनेत्री म्हणाली, 'अरे देवा, एक सेकंदही लागला नाही. तो खूप मजेशीर आणि छान व्यक्ती आहे, त्याच्यात नकलीपणा नाही. तुम्ही जे पाहता ते तुम्हाला मिळते आणि तो खूप गोड आहे. ती पुढे म्हणाली की, 'जर त्याला माहित असेल की कोणीतरी माझ्या खूप जवळ आहे आणि माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, तर तो सगळ्यांना एकत्र आणतो. मी पण अशीच मोठी झाली आहे आणि माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. अभिनेत्री म्हणाली, 'मला खोटं बोलण्याची गरज वाटत नाही कारण तो खरोखर चांगला गातो, चांगला नाचतो आणि एक चांगला अभिनेता आहे.'

'हीरामंडी'नंतर अभिनेत्रीला मिळत नाही कामफराह खानने हेदेखील सांगितले की, एका राउंड टेबल मुलाखतीत अदितीने सांगितलं होतं की, निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार'मध्ये काम केल्यानंतर तिला वाटलं की ती तिच्या करिअरमध्ये एका खास टप्प्यावर पोहचली आहे. अदितीने सांगितले की, काहीच नाही. हीरामंडी सोडा, सब्जी मंडीमध्येही नाही. कारण हीरामंडीनंतर सगळीकडून तिचे खूप कौतुक झाले. प्रेम मिळाले. मला वाटले की, आता खूप एक्साइटिंग ऑफर येतील पण मग मी विचार करू लागले की, हे काय होत आहे? खरंच दुष्काळ पडला आहे. 

टॅग्स :आदिती राव हैदरी