Join us

​ गोविंदाने केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 5:23 PM

 गोविंदाच्या चित्रपटांपासून ते अगदी त्याच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे प्रेक्षाकांची या अभिनेत्याला चांगलीच पसंती मिळत होती. नुकताच या अभिनेत्याचा वाढदिवस झाला. ...

 गोविंदाच्या चित्रपटांपासून ते अगदी त्याच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे प्रेक्षाकांची या अभिनेत्याला चांगलीच पसंती मिळत होती. नुकताच या अभिनेत्याचा वाढदिवस झाला. त्यावेळी एका वृत्तपत्राला  दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदाने विविध विषयांवर चर्चा करत बॉलिवूडमध्ये असलेल्या गटबाजीवर वक्तव्य केले. करण जोहर आणि सलमान खानविषयी केलेल्या वक्तव्यामुळेही गोविंदाने अनेकांचे लक्ष वेधले.निमार्ता-दिग्दर्शक करण जोहर विषयी बोलताना गोविंदा म्हणाला की, तुम्ही जर पाहिलत तर, तुमच्या लक्षात येईल की, करण जोहर कधीच मला त्याच्या कार्यक्रमामध्ये बोलवत नाही. तो गायक, विनोदवीर, अभिनेते आणि काही नवोदित कलाकारांना नेहमीच बोलवतो, असे म्हणत आपण कोणत्याही बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जास्त दिसत नाही या वक्तव्यावर लक्ष वेधत गोविंदाने त्याच्यासोबत घडलेल्या काही प्रसंगांचा खुलासा केला. चित्रपटसृष्टीमध्ये बºयाचदा आपल्याला वगळले जाण्याबद्दल आणि काही सेलिब्रिटी गटांचा भाग न होण्याबद्दल सांगताना गोविंदा म्हणाला की, ह्यते सर्व शिकलेले आहेत. मी त्यांच्याप्रमाणे नाहीये आणि म्हणून ते मला त्यांच्यात सामील करुन घेत नाहीत. तुम्ही अनेकदा पुरस्कारांना पाहिले असेल की, एका गटातील व्यक्तीला पुरस्काराने गौरविण्यात येते आणि त्याच्या विरोधी गटातील व्यक्ती त्याला पुरस्कार देत असते. पण, आम्ही मात्र प्रेक्षकांमध्ये बसून फक्त टाळ्या वाजवत असतो, असे म्हणत गोविंदाने बी टाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाºया गटबाजीवर टीका केली. अभिनेता सलमान खान आणि गोविंदा हे एकमेकांचे चांगले मित्र होते, पण सलमानविषयी बोलताना गोविंदा म्हणाला की, ह्यमी अमिताभ बच्चन, सलमान खान, संजय दत्त, यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. पण, एका मर्यादेनंतर या कलाकारांसोबत असलेल्या मित्रत्वाच्या नात्यातही काही बदल होतात. दोन कलाकार एकमेकांचे चांगले मित्र तोपर्यंतच असतात जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचा त्यांच्या कामावर काहीही परिणाम होत नाही. यात चुकीचे असे काहीच नाही. सलमान नेहमीच माज्या पाठिशी उभा राहिला आहे. तो माझा चांगला मित्र आहे. पण, सध्याच्या घडीला मला त्याच्याकडून काहीही अपेक्षा नाहीत. कारण त्याला माज्याबद्दल इतके काही सांगण्यात आले आहे की, यापुढे आम्ही एकत्र काम करणे अशक्यच आहे, असे गोविंदाने स्पष्ट केले. पण, त्याच्या आणि सलमानच्या नात्यामध्ये कोणामुळे दुरावा आला असे विचारले तेव्हा मात्र गोविंदाने कोणाचेही नाव घेतले नाही.