Join us  

Imran Khan : अनेक वर्षांनंतर इमरान खानने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:20 AM

इमरान खानने लहानपणीची मैत्रीण अवंतिकाशी 2011 साली लग्न केले होते.

'जाने तू या जाने ना' या सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आलेला आणि पदार्पणातच प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे इमरान खान. गेल्या अनेक काळापासून इमरान सिनेसृष्टीपासून लांब होता. आता तब्बल ९ वर्षांनी तो पुन्हा कमबॅक करत आहे. यामुळे बऱ्याच दिवसांपासून तो चर्चेत आहे. यातच एका मुलाखतीमध्ये इमरानने त्याच्या आणि अवंतिकाच्या  घटस्फोटाचं कारण सांगितलं.

इमरान खानने लहानपणीची मैत्रीण अवंतिकाशी 2011 साली लग्न केले होते. त्यांना एक मुलगीही आहे. पण दोघांचं नातं टिकू शकलं नाही. 2019 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. नुकतेच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. जेव्हा तो अंतर्गत संघर्षाने झगडत होता. तेव्हा त्याला अवंतिकाकडून कोणताच पाठिंबा मिळाला नाही, ज्यामुळे नाते टिकले नाही, असे त्याने सांगितले. 

इमरान खान म्हणाला, 'मी याबद्दल जास्त बोलणार नाही. मला गॉसिप द्यायचंं नाही.  परंतु जेव्हा मी अंतर्गत संघर्षाशी झुंजत होतो, तेव्हा मला जाणवलं की माझं लग्न आणि माझं नातं डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी माझी मदत करत नव्हतं. तर त्याचाही मला त्रास होत होता. सर्व समस्यांशी मी एकटाच झुंजत होते. एकमेंकाना आधार देणार आणि मजबूत ठेवणार नातं आमच्यात राहिलं नव्हतं'.

अवंतिका आणि इमरान खानला एक मुलगी असून तिचे नाव इमारा आहे. लग्नाच्या 8 वर्षानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. सध्या  इमरान अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचही इमरान खान गर्लफ्रेंड लेखाला घेऊन पोहोचला होता. इमरान खान आता लवकरच अभिनयात कमबॅक करणार आहे. त्याच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.