Join us

'कभी खुशी कभी गम' सिनेमात काजोल नाही तर 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड, करणने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 3:53 PM

'कभी खुशी कभी गम' सिनेमात सर्वात जास्त काही आवडलं असेल तर शाहरुख काजोलची केमिस्ट्री.

फिल्ममेकर करण जोहरचे (Karan Johar) सिनेमे म्हणजे फॅमिली ड्रामा. 'कभी खुशी कभी गम' (Kabhie Khushi Kabhie Gham) हा त्यातलाच एक सिनेमा. आजही चित्रपट टीव्हीवर लागला की अनेक जण बघत बसतात इतकी त्याची लोकप्रियता कामय आहे. यातील शाहरुख काजोलची जोडी सुपरहिट ठरली. मात्र खरंतर काजोलच्या (Kajol) जागी करणला .वेगळ्याच अभिनेत्रीला घेण्याची इच्छा होती. ती अभिनेत्री कोण?

'कभी खुशी कभी गम' सिनेमात सर्वात जास्त काही आवडलं असेल तर शाहरुख काजोलची केमिस्ट्री. त्यातही काजोलची जबरदस्त अॅक्टिंग. मात्र काजोलच्या जागी कोणा दुसऱ्याच अभिनेत्रीची कल्पना करु शकता का? नाही ना..पण करण जोहरला काजोल नाही तर ऐश्वर्या रॉयला (Aishwarya Rai) घ्यायचं होतं. करणला सुरुवातीपासूनच ऐश्वर्या सोबत काम करण्याची खूप इच्छा होती. करण म्हणाला, "मी जेव्हा कभी खुशी कभी गमची कास्टिंग करत होतो तेव्हा मला वाटलं काजोलचं लग्न झालंय तर ती या सिनेमात काम करणार नाही. म्हणून मी ऐश्वर्याला फिल्म ऑफर केली. त्या दिवशी दुपारी ३ वाजता मी काजोलच्या स्टुडिओत गेलो. मला वाटलं ती फिल्मला नकार देईल. आम्ही थोडं रडू आणि नंतर मी तिथून निघून जाईल. वास्तविक मला वाईट वाटत होतं."

तो पुढे म्हणाला, "माहित नाही कसं पण अचानक काजोल या सिनेमात काम करण्यासाठी तयार झाली. म्हणून मग मी ऐश्वर्याला भेटायला नाही गेलो. पण हो त्या फिल्मसाठी ऐश्वर्याच माझी पहिली पसंत होती. त्यानंतर मात्र ऐश्वर्यासोबत काम करण्याची संधीच मिळाली नाही."

2016 साली करण जोहरला अखेर ती संधी मिळालीच. 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात त्याने ऐश्वर्याला कास्ट केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. तसंच रणबीर कपूर आणि ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सचीही खूप चर्चा झाली.

टॅग्स :काजोलबॉलिवूडकरण जोहरऐश्वर्या राय बच्चन