Join us  

​करण जोहरने दिला सल्ला! वरूण धवनचे वाढले भाव!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 7:05 AM

वरूण धवनने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा हा स्टारकिड येत्या वर्षांत बॉक्सआॅफिसवरचे सगळे विक्रम मोडीत काढेल, असा विचारही कुणी केला ...

वरूण धवनने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा हा स्टारकिड येत्या वर्षांत बॉक्सआॅफिसवरचे सगळे विक्रम मोडीत काढेल, असा विचारही कुणी केला नव्हता. पण २०१२ मध्ये  ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या वरूणने यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही. गेल्या उण्यापु-या पाच वर्षांत वरूणने अनेक हिट्स दिलेत. त्याचे सगळे चित्रपट हिट ठरलेत. अलीकडे वरूणचा ‘जुडवा2’ रिलीज झाला आणि हा  चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला. खरे तर एकापाठोपाठ एक अशा हिट्सनंतर वरूणचे भाव वधारणे साहजिकच म्हणायला हवे. झालेही तसेच. चर्चा खरी मानाल तर वरूणने आपल्या फीमध्ये म्हणजे आपल्या मानधनात ५ कोटी रूपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे, वरूणने मेंटर करण जोहरच्या म्हणण्यावरून असे केल्याचे कळतेय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूण नव्या पिढीच्या अभिनेत्यांमध्ये सर्वाधिक यशस्वी अभिनेता आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, रणबीर कपूर अशा अनेकांना वरूणने मागे सारले आहे. रणवीर सिंग त्याचा सर्वात मोठा प्रतिद्वंदी आहे. आत्तापर्यंत वरूण आणि त्याचा मेंटर करण जोहर यांच्यात कुठलाही आर्थिक करार झालेला नव्हता. करण आपल्या चित्रपटांसाठी वरूणला त्याला वाटेल तेवढे मानधन द्यायचा. पण २०१८ मध्ये करण आपल्या एका चित्रपटासाठी वरूणला त्याच्या नव्या मार्केट प्राईजनुसार फी देणार आहे. वरुण आधी एका चित्रपटासाठी ८ कोटी रुपए फी घ्यायचा. पण यानंतर तो १३ कोटी रुपए फी घेणार आहे. एकंदर काय तर मेंटर करण जोहरच्या सल्लयाने वरूणची येत्या दिवसांत चांगलीच भरभराट होणार असे दिसतेय.ALSO READ : वरूण धवनला चाहतीने दिली आत्महत्येची धमकी! वरूणवरचं होऊ शकतो गुन्हा दाखल!!सध्या वरूण सुजीत सरकारच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटात व्यस्त आहे. आधी हा चित्रपट रणबीर कपूरला आॅफर झाला होता. पण ऐनवेळी यात वरूणची वर्णी लागली. या चित्रपटाश्विाय  शरत कटारिया यांच्या ‘सुई धागा’ या चित्रपटातही वरूण दिसणार आहे. यात तो अनुष्का शर्मासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल.