Join us  

Lata Mangeshkar Passed Away :लता मंगेशकर यांच्यावर केला होता प्राणघातक हल्ला, आवाज गमावण्याची आली होती वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 11:06 AM

Lata Mangeshkar Passed Away : लता मंगेशकर यांना माहित होते की, कोणी त्यांच्यावर केला होता जिवे मारण्याचा प्रयत्न. परंतु त्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करू शकल्या नव्हत्या.

Lata Mangeshkar Passed Away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे नुकतेच निधन झाले असून वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्या यशाच्या शिखरावर असताना कुणीतरी त्यांच्या जेवणात विष मिसळले होते आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.  या गोष्टीचा उल्लेख खुद्द लता मंगेशकर यांनी केला होता.

ही घटना आहे १९६२ सालची. त्यावेळी लता मंगेशकर फक्त ३३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जेवणातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. १९६२ साली बीस साल बाद या चित्रपटासाठी लता दीदींना गाणं रेकॉर्डिंग करायचं होतं. ज्यासाठी संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र रेकॉर्डिंगच्या काही तासांपूर्वी लता दीदींची तब्येत बिघडली होती. डॉक्टरांना बोलवून त्यांचं चेकअप केलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की, लता मंगेशकर यांच्या जेवणात स्लो पॉइजन मिसळवले होते. त्यानंतर त्यांची बहिण उषा मंगेशकर यांनी स्वतः जेवण बनवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्या हिंमत हरल्या नाहीत आणि गायन जगतात पुन्हा कमबॅक केले. म्हटले जाते की, लता दीदी जवळपास तीन महिने आजारी होत्या. त्यावेळी त्यांना आवाज गमावण्याचीदेखील भीती होती.

लोकांमध्ये होता हा गैरसमजआजही या अपघाताबाबत लोकांमध्ये एक गैरसमज आहे की, त्यावेळी लता मंगेशकर यांनी आपला आवाज गमावला होता. पण तसे नव्हते. स्वतः लता मंगेशकर यांनी सांगितले होते की, त्यांचा आवाज कधीच गेला नाही. त्या घशातून सुदृढ होती पण शरीर अशक्त झाले होते आणि त्यामुळे त्यांना रेकॉर्डिंग करता आले नव्हते. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर त्यांनी 'कहीं दीप जले कहीं दिल' हे गाणे गायले होते आणि हे गाणे सुपरहिट ठरले होते.

माहित होते विष कोणी दिले, पण...हैराण करणारी बाब आहे की लता मंगेशकर यांना माहित आहे की त्यांना कोणी विष दिले होते पण तरीही त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. कारण मंगेशकर कुटुंबीयांकडे त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते.  

टॅग्स :लता मंगेशकर