Join us  

तो मला पाच दिवसांतून एकदा फोन करतो... लग्नानंतर रणबीर कपूर झाला ‘जोरू का गुलाम’?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 5:55 PM

Neetu Kapoor On Alia Bhatt And Son Ranbir Kapoor : लग्नानंतर कसा आहे रणबीरचा आईसोबतचा बॉन्ड? काय म्हणाल्या नीतू कपूर?

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटचं (Alia Bhat) लग्न झालं, याचा सर्वाधिक आनंद कुणाला झाला असेल तर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना. आलिया सून बनून घरात आली तेव्हापासून नीतू सुनेचं कौतुक करताना थकत नाहीयेत. लग्नानंतर नाती बदलतात. रणबीर व आलियाच्या लग्नानंतर कपूर कुटुंबातही नात्याचे संदर्भ बदलले असतीलच. पण नाती कशी सांभाळायची, त्यात बॅलेन्स कसा साधायचा, हे रणबीरला चांगलंच ठाऊक आहे. एका मुलाखतीत नीतू कपूर यांनी याबद्दल सांगितलं.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत नीतू यावर बोलल्या. आई व बायको यांच्यात नेहमी नवऱ्याचं सँडवीच होतांना दिसतं. सामान्य कुटुंबात यावरून अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. पण रणबीरचं असं नाही. तो उत्तम बॅलेन्स करतो. 

काय म्हणाल्या नीतू...लग्नानंतर मुलाने बायकोला झुकतं माप दिलं की, आईला ते जाणवतं. पण रणबीर याबाबतीत प्रचंड हुशार आहे. बायको आणि आई यांच्यातील प्रेम बॅलेन्स करणं त्याला अगदी उत्तम जमतं. तो मला सतत मॉम...मॉम... करत नाही. पाच दिवसातून एकदा मला कॉल करतो. माझी विचारपूस करतो आणि माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. मी आलिया व रणबीरच्या वैवाहिक आयुष्यात जराही लुडबूड करत नाही, असं त्या म्हणाल्या.

माझं माझ्या सासूसोबत जसं नातं होतं, तसंच आलियासोबत..सुनेबद्दलही त्या भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या,‘ माझं माझ्या सासूसोबत खूप सुंदर नातं होतं. मी त्यांना खूप मिस करते. ऋषीसोबत भांडण झालं की मी त्यांना कॉल करून सांगायची. तुमच्या मुलाने हे केलं, अशी तक्रार मी करायची. यावर तुझा पती आहे, तू बघ..., असं त्या म्हणायच्या. तुमचा पण मुलगा आहे तो, असं मी रागाने म्हणायची. आमच्यात असं प्रेमळ वादविवाद होत राहायचे. माझं माझ्या सासूबाईसोबत जसं नातं होतं, तसंच आता आलिया व माझं आहे’.

टॅग्स :रणबीर कपूरनितू सिंगआलिया भट