Join us  

Rakhi Sawant: 'नाही देणार आदिलला तलाक आणि...', राखी सावंतने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 4:20 PM

Rakhi Sawant : राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच आईचं छत्र हरपले आहे. तर दुसरीकडे तिचे वैवाहिक जीवनही विस्कळीत होताना दिसत आहे. राखी सावंतचा पती आदिल सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली. यानंतर राखीचे फॅन्स हे जाणून घेण्यासाठी सतत उत्सुक असतात की भविष्यात राखी सगळं सुरळीत झाल्यावर पुन्हा आदिलसोबत राहील की त्याला घटस्फोट देऊन नव्याने आयुष्य सुरू करेल. याबाबत राखी सावंतने नुकतेच मौन सोडले आहे.

राखी सावंतने नुकतेच तिच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले. राखी म्हणाली, माझ्या अॅकाडमीतून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे प्लान आहे. त्यांना बॉलिवूडमध्ये संधी द्यायची आहे. रिएलिटी शोमध्ये चांगल्या गायकांची गरज आहे आणि दुबईत राखी सावंत अॅकेडमीत टॅलेंटचा भांडार आहे. मी मुंबईतही एक अॅकाडमी सुरू करण्याच्या तयारीत आहे. माझ्या पार्टनर्सने माझी खूप मदत केली आहे.

ती पुढे म्हणाली की, माझ्या जीवनात खूप अडचणी आल्या. मी कठीण दिवसातून गेले आहेत. मात्र आता माझ्या जीवनात आनंद परत येत आहे. पुरस्कारासाठी मला नामांकन मिळाले. मी माझी अॅकाडमी लाँच करणार आहे. आदिलमुळे मी खूप मागे पडली आहे. मात्र देवाने मला या अडचणीतून बाहेर काढले आहे. यात लोकांनी आणि मीडियाने मला खूप मदत केली आहे.राखी सावंत म्हणाली की, मी जीवनात हरले होते. मी त्या सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी मला मदत केली. जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा माझा कोणीच गॉडफादर नव्हते. मात्र आता मला प्रत्येकाचे गॉडमदर व्हायचे आहे. मला टॅलेंटला पाठिंबा द्यायचा आहे. माझ्या अॅकेडमीतून प्रत्येक टॅलेंटला मदत करायची आहे. राखी पुढे म्हणाली की, मी स्ट्राँग आहे आणि जास्त मजबूत बनण्याचा प्रयत्न करत आहे. मी जीवनात हार मानली होती. मात्र तुमच्या प्रेमाने मला पुन्हा जगण्यासाठी नवीन उमेद दिली आहे.

राखी सावंत पुढे म्हणाली, 'आदिलने मला म्हैसूर तुरुंगात बोलावले आणि सांगितले की त्याला माझ्या आयुष्यात परत यायचे आहे. त्याला संधी हवी आहे. मी आदिलच्या पाया पडले होते आणि त्याला माझ्या घरी परत येण्यास सांगितले होते. मी त्याला सर्व काही सोडून माझ्यासोबत राहण्यास सांगितले. आदिल मला माझी आई परत देऊ शकेल का? माझा आदर परत करू शकतो का? राखी म्हणाली, 'जर आदिलला परत यायचे असेल तर तो मला कधीच फसवणार नाही, असे लेखी लिहून द्यावे. माझा शारीरिक छळ करणार नाही आणि माझ्याकडून घेतलेले पैसे परत करणार. या सर्व गोष्टी मी त्याला सांगितल्या असता त्याने ते लेखी देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्याला बदला घ्यायचाय आणि मला मारायचे आहे का?' राखी स्पष्टपणे म्हणते, 'मी आदिलला घटस्फोट देणार नाही, कारण मी दुसऱ्या महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीही लग्न करणार नाही आणि मला मुलंही नको आहे. माझे विद्यार्थीच माझी मुले आहेत.
टॅग्स :राखी सावंत