Join us

"अशी वेळच का येते? तुम्हाला आधी हे समजलं नव्हतं का?"; 'रामायण'मधील लक्ष्मण संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 5:17 PM

आदिपुरुष हा चित्रपट रिलीझ झाल्यापासून विविध कारणांमुळे प्रचंड गदारोळ सुरु आहे

Laxman Sunil Lahiri, Adipurush: आदिपुरुष या चित्रपटावरुन गदारोळ सुरु आहे. रिलीज झाल्यापासून, चित्रपटातील कलाकार, पात्रे, संवाद आणि अगदी कथेबद्दल मीम्सचा पूर आला आहे. बहुतांश लोक या चित्रपटाने निराशा केल्याचा सूर आळवताना दिसत आहेत. रामानंद सागर यांच्या रामायणात लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सुनील लाहिरी यांच्याशी एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. त्यात त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपले रोखठोक मत व्यक्त केले. "हा चित्रपट किती दिशाभूल करणारा आहे. ना कथेला काही अर्थ आहे, ना पात्रांना... चित्रपटातील डायलॉग्सवरही मी नाखुश आहे," असे सुनीलने सांगितले.

"रामायण आणि या चित्रपटाची कथा वेगळी आहे. हा तर टाईमपास आहे. याचा अर्थ या चित्रपटात लॉजिक लावण्याची गरज नाही. खरे सांगायचे तर हे खूप लाजिरवाणे आहे. रामायण डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा चित्रपट बनवला आहे, असे त्यांचे म्हणणे असेल तर तो मूर्खपणा आहे. रामायणातील काही गोष्टी, किंवा काही गोष्टी, ते का कळत नाही, निर्मात्यांनी असे करण्याचा प्रयत्न का केला हे मला समजत नाही. आपल्या संस्कृतीपेक्षा वेगळे काही दाखवण्यासाठी आपण संस्कृतीशी खेळत आहोत. त्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या डिस्क्लेमरमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की हा चित्रपट पूर्णपणे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणावर आधारित आहे. तुम्ही वाल्मिकी रामायण तयार करत असताना, रावण पुष्पक विमानातून येतो हे तुम्ही सर्वत्र पाहिले आणि वाचले असेल. पण इथे वटवाघूळ येतो. माहित नाही या लोकांनी असे का केले?" अशी टीका त्यांनी केली.

सुनीलने लक्ष्मणच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. "मला समजले नाही की त्यांनी काय केले? कोणत्याही सीनमध्ये इमोशन नाही. लक्ष्मणला नुसते संवादही दिले आहेत. कोणत्याही पात्राला न्याय दिलेला नाही. त्याचबरोबर या चित्रपटाचे संवादही वेगळ्याच पातळीवरचे आहेत. तुम्ही विचारही करू शकत नाही की हनुमानजी सारख्या पात्राच्या तोंडून ऐकू येईल ते तेरे बाप का... हे काय आहे? आता ते संवाद बदलणार असल्याचे सांगत आहेत. अरे, डायलॉग बदलायची गरजच का पडली? पौराणिक पात्र संवाद कसे बोलेल हे का समजले नाही. ते दुरुस्त करण्याचा मुद्दाही का आला? याचा विचार रिलीज होण्यापूर्वी व्हायला हवा होता. लोक बघतील, ओरडतील आणि प्रसिद्धी मिळवतील असा हा व्यवसाय आहे. ते अशा प्रकारे आपल्याच देशाची संस्कृती बदनाम करत आहेत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :आदिपुरूषप्रभास