Join us

काजोल नाही तर ऐश्वर्याशी होती राणीची जवळीक, 'कॉफी विद करण'मध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:46 AM

काजोल खरंच राणीशी बोलत नव्हती का याचा खुलासा शोमध्ये झाला आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे नातलगही आहेत. मामा-भाचा, काका-पुतण्या, भाऊ-बहीण अशी अनेक नाती आहेत. या चंदेरी दुनियेत खान, कपूर, हे परिवारही प्रसिद्ध आहेत. काही नात्यांमध्ये मात्र अबोलाही आहे. मनोरंजनक्षेत्रातील दोन बहिणी काजोल आणि राणी मुखर्जी यांनी नुकतीच 'कॉफी विद करण'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये हजेरी लावली. काजोल (Kajol) आणि राणी (Rani Mukherjee)  या चुलत बहिणींचं एकमेकींशी पटत नाही अशी नेहमीच चर्चा असायची. काजोल खरंच राणीशी बोलत नव्हती का याचा खुलासा शोमध्ये झाला आहे.

काजोलपेक्षा जास्त ऐश्वर्याशी बोलायची राणी

कॉफी विद करणमध्ये राणी मुखर्जी आणि काजोल यांनी धमाल आणली आहे. यावेळी करण म्हणाला, 'हे कसं कुटुंब आहे जिथे तुम्ही एकमेकांशी बोलतच नाही?' यावर काजोल म्हणाली,'प्रत्यक्षात असं काही नाही. हा फक्त एकप्रकारचा दुरावा होता. जेव्हा कामाचा विषय येतो आम्ही दोघी ज्या स्टेजवर होतो तिथे आम्ही समाधानी होतो.'

तर राणी म्हणाली, 'मी काजोलला लहानपणापासून मी ओळखते. ती माझ्यासाठी माझी ताई होती त्यामुळे हे थोडं विचित्र होतं. तसंच मी तनिषाच्या जास्त जवळची होते आणि आजही आहे. याउलट काजोल कुटुंबातील मुलांच्या जास्त जवळ होती. म्हणून हे जरा विचित्र होतं. पण आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही एकमेकींच्या जवळ आलो. जेव्हा आपण कठीण प्रसंगातून जात असतो तेव्हा इतरांसोबत खरा बाँड तयार होतो.'

आज काजोल आणि राणीमध्ये खास नातं आहे. दरवर्षी त्यांना नवरात्रीत दुर्गा पूजा पंडालमध्ये एकत्र बघितलं गेलं. दोघींनी 'कुछ कुछ होता है' सिनेमात एकत्र काम केलं होतं.

 

टॅग्स :राणी मुखर्जीकाजोलकरण जोहरऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूड