Join us

'तुला पश्चाताप होईल'; 'Shamshera' साईन करण्यापूर्वी रणबीरला ऋषी कपूर यांनी दिलेला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 5:21 PM

Ranbir kapoor: करण मल्होत्रा (Karan Malhotra) दिग्दर्शित या चित्रपटात काम करण्यापूर्वी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी रणबीरला एक सल्ला दिला होता.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या अपकमिंग 'शमशेरा' (Shamshera) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या निमित्ताने त्याने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने चित्रपट साईन करण्यापूर्वी वडील ऋषी कपूर यांनी दिलेल्या सल्ल्याविषयी सांगितलं. 

करण मल्होत्रा (Karan Malhotra) दिग्दर्शित या चित्रपटात काम करण्यापूर्वी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी रणबीरला एक सल्ला दिला होता. 'चित्रपट करताना पश्चाताप होईल', असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या चित्रपटात ऋषी कपूर यांनी करणसोबत काम केलं होतं. परंतु, त्याच्यासोबत काम करणं किती कठीण आहे याची पूर्वकल्पना त्यांनी रणबीरला दिली होती. अग्निपथमधील काम परफेक्ट व्हावं यासाठी त्यांनी ऋषी कपूर यांच्याकडून प्रचंड मेहनत करुन घेतली होती.

"हा चित्रपट माझ्याकडे आल्यानंतर मी वडिलांशी (ऋषी कपूर) चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी मला एकच सल्ला दिला होता. ते म्हणाले, तूला खूप पश्चाताप होईल. करण मल्होत्रा प्रचंड शिस्तप्रिय दिग्दर्शक आहे. सीन परफेक्ट होईपर्यंत तो अनेक टेक्स होतो. बरीच मेहनत करुन घेतो. या सगळ्यासाठी तयार रहा. पण, आज पडद्यावर हा चित्रपट पाहताना आपल्या मेहनतीचं फळ मिळलं हे समाधान मिळतं. त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे एखादं वाईट स्वप्न पाहण्यासारखं आहे. माझ्यासाठी, वाणीसाठी आणि सगळ्याच कलाकारांसाठी हा चित्रपट म्हणजे शारीरिक मेहनतच होती", असं रणबीर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आमचं सगळं शरीर धुळीने माखलं होतं. मुंबईच्या कडक उन्हात आम्ही जाड कपडे परिधान केले होते. त्यात माझी वाढलेली दाढी, अॅक्शन सीन हे सारं करणं फार कठीण होतं. या चित्रपटात अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी सारं काही आहे. पण, अॅग्रेशन दाखवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. मी आतापर्यंत कधीच असा अॅग्रेशन, रागीट रोल केलेला नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा सीन करणं फार कठीण गेलं."

दरम्यान, या चित्रपटात रणबीरसह संजय दत्त (Sanjay Dutt) आणि वाणी कपूरदेखील (Vaani Kapoor) स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूरसिनेमाबॉलिवूड