Join us  

सलमान-संजूबाबा मैत्री संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2016 10:04 AM

सलमान खान आणि संजय दत्त हे खुप चांगले मित्र आहेत. पण संजय दत्त येरवडा तुरूंगातून सुटला तसा सलमान खान ...

सलमान खान आणि संजय दत्त हे खुप चांगले मित्र आहेत. पण संजय दत्त येरवडा तुरूंगातून सुटला तसा सलमान खान त्याला भेटलाच नाही. आता का ? हे काही माहित नाही. पण असंही कळालं होतं की,सलमानला हरयाणात ‘सुल्तान’ च्या शूटींगसाठी जावे लागणार होते म्हणून त्याने संजय दत्तसाठी पार्टीही दिली होती. नुकत्याच पार पडलेल्या एका मित्राच्या लग्नात म्हणे त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले. झालं असं की, रणबीर कपूर संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. त्यामुळे सलमान बहुदा फार काही खुश नाही. वेल, सलमान-संजय यांच्यात त्यामुळे दुरावा येऊ नये एवढेच वाटते.